Aurangabad | नवीन पाणीपुरवठा योजना 24 महिन्यात पूर्ण करणार, जीव्हीपीआर कंपनीची औरंगाबाद महापालिकेला लेखी हमी!

शहरात आज 08 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र विरोधकदेखील या निमित्ताने शिवसेनेची कोंडी करण्याचा हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेची कोंडी होऊ नये म्हणून मनपा अधिकारीदेखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.

Aurangabad | नवीन पाणीपुरवठा योजना 24 महिन्यात पूर्ण करणार, जीव्हीपीआर कंपनीची औरंगाबाद महापालिकेला लेखी हमी!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:52 AM

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या (Aurangabad municipal corporation) तोंडावर शहरात गाजत असलेल्या पाणी समस्येवर (water problem) उपाय शोधण्यासाठी मनपा प्रशासकांकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. शहरातील जीर्ण झालेली जुनी पाणीपुरवठा योजना कशी बशी दुरुस्त ठेवण्याची कसरत केली जातेय. तर अत्यंत संथ गतीनं सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेलाही कशा प्रकारे वेग मिळेल, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. नवीन पाणीपुरवठा पुढील 24 महिन्यांत पूर्ण करण्याची लेखी हमी मंगळवारी हे काम करणाऱ्या कंपनीकडून घेण्यात आली. जीव्हीपीआर कंपनीवर संबंधित योजनेचं कंत्राट (Contract) दिलेलं आहे. या कंपनीने मनपाला लेखी हमीपत्र सादर केलं. सध्या या योजनेअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य पाईप तयार करून टाकण्यासाठी प्रचंड विलंब लागतोय. देशातील नावाजलेल्या स्टील कंपन्यांकडून तयार केलेले पाईप मागवण्याचा निर्णयही मंगळवारी एका महत्त्वाच्या बैठकीत झाला.

कशी आहे नवी पाणीपुरवठा योजना?

राज्य शासनाने 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपूर्वी मंजूर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच सदर योजनेचं उद्धाटन झालं होतं. जायकवाडी धरणातून या योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. नवी योजना कार्यान्वित झाल्यानंतर औरंगाबादकरांना 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. मात्र शहरात या योजनेचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादमनध्ये आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने प्रशासनाने शहरातील पेटलेल्या पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी आढवा बैठक घेतली. याअंतर्गत प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी नव्या योजनेच्या कामाचाही आढावा घेतला.

जलवाहिनी टाकण्याचे काम 20 महिन्यांत

सध्या जायकवाडी ते नक्षत्रवाडी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुढील 11 ते 20 महिन्यांत जायकवाडी ते शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करणार असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

टँकर चालकांचं बंड

शहरात आज 08 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र विरोधकदेखील या निमित्ताने शिवसेनेची कोंडी करण्याचा हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेची कोंडी होऊ नये म्हणून मनपा अधिकारीदेखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. यासाठीच शहरातील पाणी समस्येतील एक-एक अडचणींवर उपाय शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दरम्यान, अतिरिक्त पाण्याची सोय करण्यात येत असताना मनपा कंत्राटदारांनी थकीत बिलासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. येथील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठ्याचे कंत्राट शिवसेनेच्याच एका पदाधिकाऱ्याला दिलेले आहे. शहरात सध्या 200 पेक्षा जास्त वसाहतींना टँकरद्वारे पाणी देण्यात येते.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.