AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | आमचा झेंडा भगवा, पण दिल हराभरा, शिवसेना मंत्री सत्तारांचा खा. इम्तियाज जलील यांना आशीर्वाद!

औरंगाबादः शहरातील नेहरू भवनाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात काल मोठे राजकीय नाट्य (Political Drama) रंगले. शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना तोंडभरून कोपरखळ्या मारल्या.

Aurangabad | आमचा झेंडा भगवा, पण दिल हराभरा, शिवसेना मंत्री सत्तारांचा खा. इम्तियाज जलील यांना आशीर्वाद!
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 9:44 AM
Share

औरंगाबादः शहरातील नेहरू भवनाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात काल मोठे राजकीय नाट्य (Political Drama) रंगले. शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना तोंडभरून कोपरखळ्या मारल्या. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाषणादरम्यान मनोमिलनाचे संकेत दिले. खासदार जलील यांनी सत्तार यांना उद्देशून म्हटले की, तुमच्या आशीर्वादाने 2024 मध्ये अच्छे दिन येतील. तर शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनीही टोला मारत खासदार जलील यांना हिरवे झाड द्या. आमचा झेंडा भगवा असला तरी मन हिरले आहे, असं सूचक वक्तव्य केलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

खासदार जलील यांच्याकडून मंत्र्यांचे कौतुक

शहरातील बुढी लेन परिसरातील नेहरू भवन इमारतीच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन 25 फेब्रुवारी रोजी दुपारी झाले. त्यावेळी इम्तियाज जलील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. नेहरू भवन, वंदे मातरम सभागृह, हज हाऊसच्या कामासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या पुनर्विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. अब्दुल सत्तार यांनीही त्याला ग्रीन सिग्नल दिले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, जमीर कादरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नगररचना उपसंचालक ए.बी. देशमुख आदी उपस्थित होते.

मी जिकडे जातो, तिकडे ‘सत्ता’

नेहरू भवनाच्या भूमीपूजनावेळी भाषणादरम्यान, सत्तार यांनी राजकीय फटकेबाजी केले. ते म्हणाले, माझ्या नावातच सत्ता आहे. फक्त शेवटचा र अक्षर काढला पाहिजे. चिन्ह कोणतेही असो. घोड्याची लगाम माझ्याच हाती असते. 1983 पासून मी सत्तेतच आहे. तुमच्या नशीबात विरोधी बाकावर बसायचे लिहिले आहे. शहरात काही मुस्लीम नेत्यांनी राजकीय शर्यत जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही (जलील यांनी) लंगड्या घोड्यावर रेस जिंकली, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.

नेहरू भवन इमारतीच्या भूमीपूजन, बजेट काय?

शहरात 4800 चौरस मीटर नेहरू भवनाच्या पुनर्विकासासाठी 32 कोटी 1 लाख 93 हजार रुपये लागतील, असा अंदाज आहे. हाय टेक इन्फ्रा कंपनी 18 महिन्यांत हे काम करेल, अशी अपेक्षा आहे. यात 20 दुकाने, 12 कार्यालये, एक सभागृह, प्रदर्शन गॅलरी, भव्य पार्किंग असेल.

इतर बातम्या-

युनिक कलेक्शन बघायचंय, तर चला सुरेश भट सभागृहात, नागपुरात आज आणि उद्या विविध कलाकृतींचा संग्रहच संग्रह…!

जयकुमार रावलांबद्दल नाराजी, संकटमोचकावर जबाबदारी, नाशिक जिंकण्यासाठी गिरीश महाजनांना धुरा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.