AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | सिडको-हडकोचं पाणी कोण पळवतंय? भाजपाच्या आंदोलनानंतर मनपा सक्रीय, 9 कलमी कार्यक्रम

शहरातील नागरिकांना सहा ते आठ दिवसांनी पाणी येते मग राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबादमध्येच का? असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला. पाणीपट्टी 610 रुपयेच असावी, यासाठी तुम्ही राज्य शासनाकडे आग्रह धरा, अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आली.

Aurangabad | सिडको-हडकोचं पाणी कोण पळवतंय? भाजपाच्या आंदोलनानंतर मनपा सक्रीय, 9 कलमी कार्यक्रम
पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 06, 2022 | 9:27 AM
Share

औरंगाबाद | शहरातील जीर्ण झालेली जुनी पाणीपुरवठा योजना (Water Supply) आणि अत्यंत संथ गतीने सुरु असलेल्या नव्या पाणी योजनेमुळे औरंगाबादकरांची (Aurangabad) कोंडी होतेय. त्यातच शहराला जे पाणी येतंय, त्यातही चोरी होतेय, नागरिकांना ड्रेनेज मिश्रित घाणी पाणी येते, असे आरोप करत भाजपाने (BJP) आक्रमक भूमिका घेतली. मनपा प्रशासकांच्या बंगल्यासमोर आणि सिडकोतील एन- 5 जलकुंभासमोर भाजपने आक्रोश आंदोलन केले. त्यानंतर मनुपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी या विषयावर विस्तृत बैठक घेतली. तसेच पाण्याची गळती नेमकी कुठे होते, हे तपासण्यासाठी नऊ कलमी कार्यक्रम आखण्यात आला. शहरातील नागरिकांना सहा ते आठ दिवसांनी पाणी येते मग राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबादमध्येच का? असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला. पाणीपट्टी 610 रुपयेच असावी, यासाठी तुम्ही राज्य शासनाकडे आग्रह धरा, अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आली.

हक्काचे पाणी मुरते कुठे?

सोमवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, नक्षत्रवाडीपासून एन-5 च्या जलकुंभात दररोज 55 एमएलडी पाणी एक्सप्रेस जलवाहनीतून दिले जाते. प्रत्यक्षात 35 एमलडी पाणीच पोहोचते. शिवाजीनगर आणि पुंडलिक नगरसाठी प्रत्येकी 4 एमएलडी पाणी दिले जाते. म्हणजे 8 एमएलडी पाणी 55 एमएलडी पाण्यातून वजा केल्यास 10 एमएलडी पाण्याचा हिशोब लागत नाही. हे पाणी जाते कुठे, याची चौकशी करावी. एन- 5 जलकुंभावर कर्मचारी पैसे घेऊन जास्तीचे टँकर भरून देतात, ही बाब गंभीर आहे, असा आरोप अतुल सावे यांनी केला.

प्रशासकांचा नऊ कलमी कार्यक्रम

दरम्यान, शहरातील पाणी चोरी नेमकी कुठे होते, हे तपासण्यासाठी मनपा प्रशासकांनी नऊ कलमी कार्यक्रम आखला आहे. येत्या 15 दिवसात चोर शोधले जातील, असे आश्वासन प्रशासकांनी दिले असून पुढील नऊ उपायांद्वारे हे आश्वासन पूर्ण केले जाईल. – जलकुंभावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार – टँकरवर जीपीएस – मीटर दुरुस्ती – नक्षत्रवाडी ते एन-५ जलवाहिनीवर दोन अधिकाऱ्यांची निगराणी ठेवणार – गळती, चोरी शोधणार – पाणी वितरणाची नोंदवही ठेवणार – दोषी अधिकाऱ्यांची उचलबांगी अथवा कारवाई – वेळापत्रकात सुधारणा – ड्रेनेज दुरुस्ती

नव्या पाणीपुरवठा योजनेवर आज मंत्रालयात बैठक

महाराष्ट्र राज्य शासनाने औरंगाबादसाठी 1680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मागील दोन वर्षभरापासून योजनेचे कामही सुरु झाले आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यातच जुनी योजना जीर्ण झाल्यामुळे त्यातील जलवाहिन्या वारंवार फुटतात आणि नागरिकांना पाण्यासाठी तिष्ठत रहावे लागते. त्यामुळे नव्या योजनेला गती देण्यासाठी तसेच त्यातील विविध अडचणी सोडवण्यासाठी आज बुधवारी मंत्रालयात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. ही माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

इतर बातम्या-

Virat Kohli Runout IPL 2022: सॅमसनचा सुपरमॅन थ्रो, चहलची चालाकी आणि विराट RUNOUT पहा VIDEO

WHO Global Air Quality Index : जगातील 99 टक्के लोक घेतायत दूषित हवेत श्वास, भारताची स्थिती नेमकी कशी?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या