AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात माळा टाकल्यानंतरही तिनं स्पष्ट नकार दिला, आत्तेभावाशी नातं जोडलं, औरंगाबादच्या लग्नातल्या धिंगाण्याची गोष्ट चर्चेत!

चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली. पण नवरीचे लग्न मोडल्याने नातेवाईक चिंतेत होते. इतर नातेवाईकांच्या मदतीने रात्री साडेनऊ वाजता नवरीच्या आत्याच्या मुलाशी तिचे लग्न लावले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

गळ्यात माळा टाकल्यानंतरही तिनं स्पष्ट नकार दिला, आत्तेभावाशी नातं जोडलं, औरंगाबादच्या लग्नातल्या धिंगाण्याची गोष्ट चर्चेत!
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 3:45 PM
Share

औरंगाबादः मुलाकडून आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी लग्नात गोंधळ घातल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. औरंगाबादेतही  (Aurangabad marriage)असाच प्रकार घडला. दारू पिऊन आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडी मंडळींनी लग्न मंडपात खूप धिंगाणा घातला. वऱ्हाडातील तरुण मंडळींनी गावकऱ्यांशीच वाद घातले. वाहनांची तोडफोड केली. एवढंच नाही तर नवरदेवानंही वऱ्हाडी मंडळींना साथ दिली. नवरीशी (Bride) लग्न करण्यासच नकार दिला. गावकऱ्यांनी कशी बशी विनंती करून नवरा-नवरीचं लग्न लावलं. पण एवढं करूनही नवऱ्याचे नखरे थांबतच नव्हते. मग काय नवरीनं हे लग्नच नाकरलं. गावकऱ्यांसमोर मोठी पंचाईत झाली. अखेर नवरीच्या आत्तेभावाशी नातं जोडायचा निर्णय झाला आणि आणखी एकदा लग्न लागलं. औरंगाबादमध्ये मुंबईतून (Mumbai) आलेल्या या वऱ्हाडाच्या गोंधळाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

कुठे घडला प्रकार?

औरंगाबादेतील गांधेली येथील लग्नात बुधवारी हा प्रकार घडला. मुंबईतून आलेल्या वऱ्हाडी मंडळीतील अनेकांनी दारू प्यायली होती. विक्रोळीतून हे वऱ्हाड दुपारी साडेबाराच्या सुमारास आले. नवरदेवाची वरात निघणार तोच मुंबईच्या मित्रांनी गोंधळ सुरु केला. ते गावकऱ्यांचं ऐकतच नव्हते. दुपारचे तीन वाजले तरी लग्न लागले नव्हते. वऱ्हाडींनी लग्नात येथेच्छ गोंधळ घातला. अखेर नवऱ्याने लग्नालाही नकार दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी मनधरणी करून कसेबसे लग्न लावले.

आत्याच्या मुलासोबत लग्न

लग्नात झालेला हा राडा पाहून वधू दुःखी झाली होती. कसेबसे लग्न लागले. मुलीच्या पाठवणीची वेळ आली तरीही नवरदेव आणि त्याच्या मित्रांचा गोंधळ सुरूच होता. अखेर नवरीनेच अशा नवऱ्यासोबत नांदण्यास नकार दिला. त्यामुळे मुंबईच्या वऱ्हाडींना फटके मारत पाठवून देण्यात आले. चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली. पण नवरीचे लग्न मोडल्याने नातेवाईक चिंतेत होते. इतर नातेवाईकांच्या मदतीने रात्री साडेनऊ वाजता नवरीच्या आत्याच्या मुलाशी तिचे लग्न लावले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.