AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad election: औरंगाबाद जिल्हा परिषद गट व गणांच्या पुनर्रचनेची यादी सोशल मीडियावर, चर्चांना उधाण

एका जिल्हा परिषद मतदार संघात किमान 31 हजार मतदार अपेक्षित धरून नवीन गटांची पुनर्रचना करायची आहे. 2011 ची जनगणना व त्यानंतर होणारी मतदारांची अपेक्षित वाढ धरल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत 8 नव्या जिल्हा परिषद मतदार संघाची भर पडणार आहे.

Aurangabad election: औरंगाबाद जिल्हा परिषद गट व गणांच्या पुनर्रचनेची यादी सोशल मीडियावर, चर्चांना उधाण
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 7:00 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. त्याआधी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची पुनर्रचना करण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी हे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगत आहेत. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या पुनर्रचनेचे तक्ते राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आपापल्या गट आणि गणात घेऊन मिरवत आहेत. सोशल मीडियावरही या याद्या फिरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात अनेक चर्चांना उधाण येत आहे.

नव्या आराखड्यात काय बदल?

एका जिल्हा परिषद मतदार संघात किमान 31 हजार मतदार अपेक्षित गृहित धरून नवीन गटांची पुनर्रचना करायची आहे. 2011 ची जनगणना व त्यानंतर होणारी मतदारांची अपेक्षित वाढ धरल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत 8 नव्या जिल्हा परिषद मतदार संघाची भर पडणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेत 62 गट आणि पंचायत समितीचे 122 गण आहेत. मात्र पुनर्रचना झाल्यानंतर 70 गट आणि 140 गणांमध्ये निवडणुका होणार आहेत. महसूल विभागाला नव्याने निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नवीन पुनर्रचनेत वडगाव कोल्हाटी, गेवराई ब्रुकब्राँड, पिंप्रीबु, चौका, लाडसावंगी, सावंगी, करमाड, गोलटगाव आणि तिसगाव गट दाखवण्यात आला आहे.

औरंगाबाद तालुक्यात काय बदल?

औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. नव्याने होणाऱ्या रचनेत औरंगाबाद तालुक्यात दहा जिल्हा परिषद गट व वीस पंचायत समिती गण असतील.

इतर बातम्या-

अर्थमंत्री येऊन पराभव करून जातात, याला अक्कल म्हणतात; राणेंचा अजितदादांना टोला

VIDEO : चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार; नारायण राणे गल्लीतील भांडण दिल्लीत नेणार

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.