AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad election: औरंगाबाद जिल्हा परिषद गट व गणांच्या पुनर्रचनेची यादी सोशल मीडियावर, चर्चांना उधाण

एका जिल्हा परिषद मतदार संघात किमान 31 हजार मतदार अपेक्षित धरून नवीन गटांची पुनर्रचना करायची आहे. 2011 ची जनगणना व त्यानंतर होणारी मतदारांची अपेक्षित वाढ धरल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत 8 नव्या जिल्हा परिषद मतदार संघाची भर पडणार आहे.

Aurangabad election: औरंगाबाद जिल्हा परिषद गट व गणांच्या पुनर्रचनेची यादी सोशल मीडियावर, चर्चांना उधाण
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 7:00 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. त्याआधी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची पुनर्रचना करण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी हे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगत आहेत. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या पुनर्रचनेचे तक्ते राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आपापल्या गट आणि गणात घेऊन मिरवत आहेत. सोशल मीडियावरही या याद्या फिरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात अनेक चर्चांना उधाण येत आहे.

नव्या आराखड्यात काय बदल?

एका जिल्हा परिषद मतदार संघात किमान 31 हजार मतदार अपेक्षित गृहित धरून नवीन गटांची पुनर्रचना करायची आहे. 2011 ची जनगणना व त्यानंतर होणारी मतदारांची अपेक्षित वाढ धरल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत 8 नव्या जिल्हा परिषद मतदार संघाची भर पडणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेत 62 गट आणि पंचायत समितीचे 122 गण आहेत. मात्र पुनर्रचना झाल्यानंतर 70 गट आणि 140 गणांमध्ये निवडणुका होणार आहेत. महसूल विभागाला नव्याने निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नवीन पुनर्रचनेत वडगाव कोल्हाटी, गेवराई ब्रुकब्राँड, पिंप्रीबु, चौका, लाडसावंगी, सावंगी, करमाड, गोलटगाव आणि तिसगाव गट दाखवण्यात आला आहे.

औरंगाबाद तालुक्यात काय बदल?

औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. नव्याने होणाऱ्या रचनेत औरंगाबाद तालुक्यात दहा जिल्हा परिषद गट व वीस पंचायत समिती गण असतील.

इतर बातम्या-

अर्थमंत्री येऊन पराभव करून जातात, याला अक्कल म्हणतात; राणेंचा अजितदादांना टोला

VIDEO : चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार; नारायण राणे गल्लीतील भांडण दिल्लीत नेणार

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.