AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Updates | औरंगाबादेत आजपासून हॉटेलवरील वेळांचे निर्बंध हटले, शहरात आणखी काय काय सुरळीत होणार?

औरंगाबादमधील हॉटेल्समध्ये 50 टक्के टेबलवरच फूड सर्व्हिस देण्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र हॉटेल सुरु राहण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. - हॉटेल्स 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर सुरु राहिलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येईल.

Corona Updates | औरंगाबादेत आजपासून हॉटेलवरील वेळांचे निर्बंध हटले, शहरात आणखी काय काय सुरळीत होणार?
सांकेतिक छायाचित्र
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 09, 2022 | 2:20 PM
Share

औरंगाबादः कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) धोका ओळखून आणि राज्य सरकारने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध हॉटेल्स आणि आस्थापना 50 टक्के क्षमतेतच सुरु ठेवण्याची अट घातली होती. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या (Hotels in Aurangabad) उदयोगावर परिणाम होत होता. तसेच हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचेही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आजपासून म्हणजेच 9 फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील हॉटेल्सच्या वेळा वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडे मंगळवारी हॉटेल असोसिएशनची बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर जिल्ह्यात पर्यटनासह उद्योग वृद्धी व बेरोजगारी कमी करण्यासाठी हॉटेल्सच्या वेळा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात आणखी काय काय पूर्वपदावर?

– हॉटेल्समध्ये 50 टक्के टेबलवरच फूड सर्व्हिस देण्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र हॉटेल सुरु राहण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. – हॉटेल्स 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर सुरु राहिलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येईल. – आजापासून शहरातील पर्सिद्ध सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय देखील सुरु करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. महापालिकेला येथील तिकिटापोटी दररोज एक लाख रुपये येतात. त्यामुळे आता उद्यानदेखील पूर्वीप्रमाणे सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. – शहरातील शाळांचे पाचवी ते सातवीचे वर्ग मंगळवारपासून सुरु झाले आहेत. शाळांमध्ये सुरुवातीला 30 टक्केच उपस्थिती दिसून आली. मात्र हळू हळू विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

-लसीकरणाबाबतचे नियम सर्वच ठिकाणी तसेच ठेवण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावण्यासाठी कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेणे बंधन कारक करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय?

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढलेली दिसून आली. मंगळवारी जिल्ह्यात 158 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी शहरात 108 तर ग्रामीण भागात 50 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. शहरात मागील 24 तासात दोन जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.

मराठवाड्यातील कोरोना स्थिती काय?

मंगळवारी म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे- जालना- 43 परभणी- 89 नांदेड-131 हिंगोली- 142 बीड- 115 लातूर- 157 उस्मानाबाद- 137

इतर बातम्या-

द्राक्षांच्या घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट; आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता

अंकिता जळीतकांड प्रकरण : आरोपीला दोषी ठरविल्याने आई-वडील समाधानी, तर बचाव पक्षाची तयारी काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली