AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 80 सिंचन प्रकल्पांची पडझड, 51 कोटी रुपयांचे नुकसान

जिल्ह्यातील 10 मध्यम व 63 लघु सिंचन प्रकल्प तसेच 7 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पाहणीतून समोर आले आहे. हे बंधारे 1950 ते 2000 या कालावधीत बांधले असून 10-12 वर्षात त्यांची निधीअभावी देखभाल, दुरूस्ती झालेली नाही.

Aurangabad: दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 80 सिंचन प्रकल्पांची पडझड, 51 कोटी रुपयांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 80 सिंचन प्रकल्पांचे नुकसान झाले आहे.
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 02, 2021 | 2:13 PM
Share

औरंगाबादः गेल्या दोन महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतासोबतच सिंचन प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या 80 लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांचे तब्बल 51.71 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. काही प्रकल्पाच्या भिंती कोसळल्या, तर काहींना भगदाडे पडले. काही ठिकाणी केटी बंधारे वाहून गेले आहेत. पुढील धोका टाळण्यासाठी त्यांची दुरूस्ती आवश्यक असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे एकिकडे पाटबंधारे विभागाचे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम.निंभोरे (A.M. Nimbhore) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पांची क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector of Aurangabad) सादर करण्यात आला. या प्रकल्पातून एकूण 42224 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

1950 ते 2000 या काळातील बंधारे

जिल्ह्यातील 10 मध्यम व 63 लघु सिंचन प्रकल्प तसेच 7 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पाहणीतून समोर आले आहे. हे बंधारे 1950 ते 2000 या कालावधीत बांधले असून 10-12 वर्षात त्यांची निधीअभावी देखभाल, दुरूस्ती झालेली नाही. सततच्या पावसाने हे प्रकल्प 100 टक्के क्षमतेने भरले. तर 28 सप्टेंबरच्या गुलाब चक्रीवादळामुळे 100 मीमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे धरणे आणि कालव्यांची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे धरणांना धोका निर्माण झाल्याचे निंभारे यांनी सांगीतले.

दुरूस्तीसाठी 51.71 कोटीची गरज

पाटबंधारे उपविभाग 1 मधील 2 मध्यम आणि 20 लघु प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी 15.56 कोटी रूपये, उपविभाग 2 मधील 1 मध्यम आणि 15 लघु प्रकल्पांसाठी 13.76 कोटी, उपविभाग 3-कन्नडमधील 2 मध्यम आणि 16 लघु प्रकल्पांसाठी 6.14 कोटी, उपविभाग 4-कन्नडच्या 2 मध्यम आणि 4 लघु प्रकल्पासाठी 6.15 कोटी तर उपविभाग 5-सिल्लोडच्या 3 मध्यम आणि 14 लघु प्रकल्पांसाठी 10.10 कोटी रूपये लागणार आहेत. जिल्ह्यातील एकूण 10 मध्यम आणि 69 लघु प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी 51.71 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव

सिंचन वर्ष 2021-22 चा रबी आणि उन्हाळी हंगाम राबवण्याकरिता अतीवृष्टीमुळे झालेले नुकसान दुरूस्त करणे अत्यावश्यक आहे. कालव्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पाणी जाण्यासाठी तसेच धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कामे तात्काळ करावी लागतील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती ए.एम.निंभोरे, कार्यकारी अभियंता, औरंगाबाद पाटबंधारे विभाग यांनी दिली आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold: सोन्यानं झटकली मरगळ, दरात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर काय?

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक