AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्ह्यात गणेशोत्सवात मिरवणुकांना मज्जाव, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्या महाप्रसाद वाटप आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमांनाही बंदी

गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे असल्यास स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत/ नगरपरिषद यांच्याद्वारे उपलब्ध वाहनातच एकत्रित मूर्ती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विसर्जनासाठी घराबाहेर न पडता सदरच्या वाहनात गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जमा करावी.

औरंगाबाद जिल्ह्यात गणेशोत्सवात मिरवणुकांना मज्जाव, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्या महाप्रसाद वाटप आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमांनाही बंदी
गणेश चतुर्थीला अवश्य करुन पहा या 5 फ्युजन पाककृती
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 5:29 PM
Share

औरंगाबाद: येत्या शुक्रवारी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे दाट सावट होते. यंदा मात्र त्यात काहीशी शिथिलता आली आहे. तरीही सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना कोणत्या सूचना आणि निर्देशांचे पालन करायचे याबाबत मार्गदर्शिका नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत होत असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार गणपतींची स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच औरंगाबादमधील ग्रामीण पोलिस विभागातर्फे (Aurangabad Rural Police) आणखी काय नियमावली देण्यात आली आहे, ते पाहुयात-

  1. पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करणे सर्वात चांगले.
  2. गणेशमूर्ती घरी आणण्याकरिता किंवा विसर्जन करण्यासाठी कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही.
  3.  मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक महाप्रसाद वाटप, भंडारा यासारखे लोकसमुहांचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
  4.  भजन, कीर्तन, आरती व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

स्थानिक प्रशासनाच्या वाहनातच विसर्जन

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे असल्यास स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत/ नगरपरिषद यांच्याद्वारे उपलब्ध वाहनातच एकत्रित मूर्ती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विसर्जनासाठी घराबाहेर न पडता सदरच्या वाहनात गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जमा करावी. शक्य असल्यास वैज्ञानिक पद्धतीने घरच्या घरीच मूर्तींचे विसर्जन करण्यावर भर द्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन स्पर्धा घेतल्या जाव्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करतानाच हा गणेशोत्सव आनंददायी व जल्लोषपूर्ण होण्यासाठी औरंगाबाद ग्रामीम जिल्हा पोलिस दलातर्फे ऑनलाइन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यात रांगोळी, निबंद, सेल्फी विथ ट्री, चित्रकला, एकपात्री नाटक, संदेशात्मक देखावे अशा श्रेणींमध्ये स्पर्धक ऑनलाइन स्पर्धेकरिता सहभाग नोंदवू शकतात.

एक गाव एक गणपतीस प्रोत्साहन

ग्रामीण जिल्हा पोलिस दलातर्फे एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या संकल्पनेतून 280 गणपती बसवण्यात आले होते. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवत इतरही गावांनी याच पद्धतीने गणपती बसवावे, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान कायदा व शांततेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या- 

Ganesh Chaturthi 2021 | भगवान गणेशाच्या या 108 नावांचा जप करा, विघ्नहर्ता सर्व विघ्न दूर करतील

Ganesh Chaturthi 2021 | श्रीगणेशाच्या आगमनावेळी अक्षतांचा वापर का केला जातो? जाणून घ्या

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.