AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Speed Train: समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे नियंत्रण केंद्र औरंगाबादेत!

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर अशा हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्पालाही आता वेग मिळताना दिसतोय. या प्रकल्पाचे रेल्वेचे प्रादेशिक केंद्र

High Speed Train: समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे नियंत्रण केंद्र औरंगाबादेत!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 24, 2021 | 7:10 AM
Share

औरंगाबादः मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला (Samruddhi High way) समांतर अशा मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेच्या (High Speed Train) प्रस्तावित प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासह इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तयार होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास औरंगाबादहून मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त पावणेदोन तासाचा वेळ लागणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटरचा ट्रॅक

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागपूर ते शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रकल्पही प्रस्तावित आहे. चार महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया कशी असणार यासह इतर बाबींवर रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन, शेतकरी, नागरिकांमध्ये सखोल चर्चा झाली. आता जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या रेल्वेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहेत. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून लवकरच डीपीआरचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी या बाबी स्पष्ट होतील.

हायस्पीड रेल्वे- औरंगाबादेत कुठे कुठे भूसंपादन?

औरंगाबाद जिल्ह्यात तीन गावांजवळून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी 167.96 हेक्टर जमीन लागणार असून 73.73 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन सरकारी अशी वापरली जाईल. सरकारी 201 तर खासगी 410 भूखंड यासाठी संपादित करावे लागतील. औरंगाबाद तालुक्यात 23 गावांतील 61.94 हेक्टर जागेचा यात समावेश आहे. गंगापूरमध्ये 11 गावांतील 37.10 तर वैजापुरात 15 गावांतील 67.90 हेक्टर जागेचा यात समावेश आहे.

इतर बातम्या-

तो आला… त्याने नाव नोंदवलं… अन् लस न घेताच पळून गेला; काय चाललंय काय डोंबिवलीत?

Obc reservation : ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो-भुजबळ

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप