AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Speed Train: समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे नियंत्रण केंद्र औरंगाबादेत!

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर अशा हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्पालाही आता वेग मिळताना दिसतोय. या प्रकल्पाचे रेल्वेचे प्रादेशिक केंद्र

High Speed Train: समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे नियंत्रण केंद्र औरंगाबादेत!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 24, 2021 | 7:10 AM
Share

औरंगाबादः मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला (Samruddhi High way) समांतर अशा मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेच्या (High Speed Train) प्रस्तावित प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासह इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तयार होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास औरंगाबादहून मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त पावणेदोन तासाचा वेळ लागणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटरचा ट्रॅक

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागपूर ते शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रकल्पही प्रस्तावित आहे. चार महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया कशी असणार यासह इतर बाबींवर रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन, शेतकरी, नागरिकांमध्ये सखोल चर्चा झाली. आता जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या रेल्वेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहेत. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून लवकरच डीपीआरचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी या बाबी स्पष्ट होतील.

हायस्पीड रेल्वे- औरंगाबादेत कुठे कुठे भूसंपादन?

औरंगाबाद जिल्ह्यात तीन गावांजवळून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी 167.96 हेक्टर जमीन लागणार असून 73.73 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन सरकारी अशी वापरली जाईल. सरकारी 201 तर खासगी 410 भूखंड यासाठी संपादित करावे लागतील. औरंगाबाद तालुक्यात 23 गावांतील 61.94 हेक्टर जागेचा यात समावेश आहे. गंगापूरमध्ये 11 गावांतील 37.10 तर वैजापुरात 15 गावांतील 67.90 हेक्टर जागेचा यात समावेश आहे.

इतर बातम्या-

तो आला… त्याने नाव नोंदवलं… अन् लस न घेताच पळून गेला; काय चाललंय काय डोंबिवलीत?

Obc reservation : ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो-भुजबळ

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत