High Speed Train: समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे नियंत्रण केंद्र औरंगाबादेत!

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर अशा हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्पालाही आता वेग मिळताना दिसतोय. या प्रकल्पाचे रेल्वेचे प्रादेशिक केंद्र

High Speed Train: समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे नियंत्रण केंद्र औरंगाबादेत!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 7:10 AM

औरंगाबादः मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला (Samruddhi High way) समांतर अशा मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेच्या (High Speed Train) प्रस्तावित प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासह इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तयार होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास औरंगाबादहून मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त पावणेदोन तासाचा वेळ लागणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटरचा ट्रॅक

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागपूर ते शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रकल्पही प्रस्तावित आहे. चार महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया कशी असणार यासह इतर बाबींवर रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन, शेतकरी, नागरिकांमध्ये सखोल चर्चा झाली. आता जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या रेल्वेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहेत. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून लवकरच डीपीआरचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी या बाबी स्पष्ट होतील.

हायस्पीड रेल्वे- औरंगाबादेत कुठे कुठे भूसंपादन?

औरंगाबाद जिल्ह्यात तीन गावांजवळून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी 167.96 हेक्टर जमीन लागणार असून 73.73 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन सरकारी अशी वापरली जाईल. सरकारी 201 तर खासगी 410 भूखंड यासाठी संपादित करावे लागतील. औरंगाबाद तालुक्यात 23 गावांतील 61.94 हेक्टर जागेचा यात समावेश आहे. गंगापूरमध्ये 11 गावांतील 37.10 तर वैजापुरात 15 गावांतील 67.90 हेक्टर जागेचा यात समावेश आहे.

इतर बातम्या-

तो आला… त्याने नाव नोंदवलं… अन् लस न घेताच पळून गेला; काय चाललंय काय डोंबिवलीत?

Obc reservation : ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो-भुजबळ

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....