AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत 30 एप्रिलपर्यंत मिशन फर्स्ट उपक्रम, गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न, काय आहे योजना?

'मिशन फर्स्ट' या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मुलाला किमान लिहता-वाचता आणि गणित येणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने शिक्षकांना उपक्रम राबवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि गणिते सोडवण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

औरंगाबादेत 30 एप्रिलपर्यंत मिशन फर्स्ट उपक्रम, गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न, काय आहे योजना?
नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा फक्त सकाळीच भरतील. Image Credit source: tv 9
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 04, 2022 | 7:36 PM
Share

औरंगाबाद : कोरोनाचा सर्वाधिक परिणाम (Corona Effect on Student) हा शिक्षण क्षेत्रावर झालेला आहे. ऑनलाईनप्रणालीही परिणामकारक ठरली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की सर्व प्रथम शाळा, महाविद्यालये ही बंद केली जात होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हे महत्वाचे असले नव्याने शाळेत (Students in School) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना अद्यापपर्यंत अक्षर ओळखही झालेली नाही. प्राथमिक शिक्षणातील अध्ययनस्तरच घसरलेला आहे. आता हा घसरलेला स्तर उंचावण्यासाठी औरंगाबाद शिक्षण (Aurangabad education department) विभागाच्यावतीने ‘मिशन फर्स्ट’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच 30 एप्रिलपर्यंत इयत्ता पहिली ते तिसरी चे वर्ग सुरुच राहणार आहेत. गुणवत्तावाढीसाठी 100 दिवस वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार असल्याचे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी सांगितले आहे.

सर्वेक्षणात वास्तव समोर..

गेल्या दोन वर्षात अनेक वेळा कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. या दरम्यानच्या काळात ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला मात्र, तो प्रभावीपणे राबवणे शक्य झाले नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे यापासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे वाचन, लेखन एवढेच नाही तर गणितासारख्या महत्वाच्या विषय़ावरही परिणाम झाला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशाच परस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला तर शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न कायम राहणार आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमात दडलंय काय?

‘मिशन फर्स्ट’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मुलाला किमान लिहता-वाचता आणि गणित येणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने शिक्षकांना उपक्रम राबवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि गणिते सोडवण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहेत. इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे 30 एप्रिलपर्यंत म्हणजेच 100 दिवस वर्ग भरणार आहेत. आता जे गेल्या शैक्षणिक वर्षात जमले नाही ते आता 100 दिवसांमध्ये करुन घ्यावे लागणार आहे.

ऑनलाईन शिक्षण परिषद

शिक्षण विभागाच्या या अनोख्या उपक्रमाची माहिती जिल्हाभरातील शिक्षकांना होण्याच्या दृष्टीने संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख हे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन शिक्षण परिषद घेतली गेली.. या माध्यमातून या मिशन फर्स्टची माहिती आणि प्रत्यक्ष वर्ग सुरु केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणते प्राथमिक शिक्षण द्यायचे याची माहिती दिली गेली. विद्यार्थी क्षमतेनुसार मराठी, गणित आणि उर्दू या विषयाची तयारी करुन घेतली जाणार आहे. शिवाय जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ हे देखील 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

इतर बातम्या-

Accident | रस्ता सोडून कार शिवारात उलटली! दर्यापूर अंजनगाव रोडवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Up elections 2022 : रिव्हॉल्वर, रायफल, 49 हजारांचे कुंडल, 20 हजारांची रुद्राक्ष माळ, वाचा योगींची संपत्ती किती?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली