AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भल्या मोठ्या सैन्याला जेवण कसे द्यायचे? तुघलकांनी तयार केला अनोखा पदार्थ, जो आजही ठरतोय औरंगाबादच्या खवैय्यांची पहिली पसंत!

ऐतिहासिक शहराच्या वास्तूंच्या निर्मितीमागे जसा इतिहास असतो, तसा प्रत्येक शहराच्या लोकप्रिय खाद्य पदार्थाचाही इतिहास असतो. इथल्या परंपरांमध्ये या खाद्यपदार्थानं वेगळं स्थान मिळवलेलं असतं. औरंगाबादचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ नान खलियालाही असाच एक इतिहास आहे.

भल्या मोठ्या सैन्याला जेवण कसे द्यायचे? तुघलकांनी तयार केला अनोखा पदार्थ, जो आजही ठरतोय औरंगाबादच्या खवैय्यांची पहिली पसंत!
औरंगाबादचा प्रसिद्ध पदार्थ नानखलिया
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 8:00 AM
Share

औरंगाबादः इतिहासाच्या, आक्रमणाच्या अनेक खुणा अंगाखांद्यावर खेळवणारं औरंगाबाद (Aurangabad) शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. शहरावर, इथल्या परिसरावर राज्य करणाऱ्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांच्या खुणा इथल्या माती, इथल्या गड-किल्ल्यांत अजूनही जिवंत आहेत. शहरातल्या वास्तु जशा इथल्या इतिहासाच्या घटना कथन करतात, त्याप्रमाणेच इथल्या खाद्यसंस्कृतीतूनही इतिहासातील काही संदर्भ मिळतात. औरंगाबादमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ असलेल्या नान खलिया (Nan Khalila) या पदार्थालाही असाच एक इतिहास आहे.

कथा नान खलियाच्या निर्मितीची

प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी यांनी औरंगाबादच्या खाद्य संस्कृतीवरही सविस्तर अभ्यास केलाय. त्यांनी नान खलिया या खाद्यपदार्थाच्या निर्मितीचीही कथा सांगितली आहे. औरंगाबाद शहराची निर्मिती होण्याचा आधी दौलताबाद हे एक आबाद शहर होते. म्हणूनच खाद्यपदार्थाची सुरुवात येथून झाली. मोहम्मद तुघलकाने जेव्हा हिंदुस्तानच्या राजधानीचे स्थलांतर दिल्लीहून औरंगाबादला केले तेव्हा सुरुवातीला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे एवढ्या मोठ्या सैन्याचे भोजन कसे तयार करायचे? हा प्रश्न त्याने सोडवला, तो नव्या खाद्य पदार्थाच्या निर्मितीतून. हाच पदार्थ म्हणजे नान खलिया!

कसा बनवतात नान खलिया?

नान खलिया हा पदार्थ पूर्ण मांसाहारी आहे. नान म्हणजे रोटीचा प्रकार व खलिया म्हणजे मटण. यात नान ही तंदूरमध्ये बनवत असत. म्हणजे मोठे खड्डे खोदून त्यात जळाऊ लाकूट लावून एकेका वेळेस शंभर शंभर नान बनवत असत. असे अनेक तंदूर लावून हजारो नान बनवले जात. तसेच अनेक मोठ्या देगमध्ये मटण, दही, धणे, गरम मसाला, वाटून ते शिजवले जात. पुढे दख्खनची राजधानी दौलताबादहून औरंगाबादला स्थलांतरीत झाली, तसे इथल्या खाद्यपदार्थाचेही स्थलांतर झाले.

गरीब असो की श्रीमंत, नानखलियाचे दिवाने अनेक!

औरंगाबादमधील मांसाहारी खाद्यपदार्थ आवडणाऱ्या व्यक्तींची कोणतीही पार्टी असो, लग्न असो वा इतर कार्यक्रम. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाकडे नान खलिया असतोच. नान खलियाच्या चाहत्यांनी तर नानखलिया क्लबदेखील स्थापन केले आहेत. दर आठवड्यात एका सदस्याकडे नान खलियाची पार्टी असते. नान खलियाच्या पार्टीत मित्रांना आवर्जून बोलवण्याची प्रथा इथे आहे. शहरातील रोशन गेट, कटकट गेट, सिटी चौक, चंपा चौक, बुढी लेन परिसरातील हॉटेलमध्ये मिळणारा लाजवाब नान खलिया चाखणारे हजारो दिवाने इथे सापडतील.

इतर बातम्या-

सौ दर्द छुपे है सिने में… मगर अलग मजा है जिने में… भुजबळांची शेरोशायरीतून तिरंदाजी सुरू असतानाच वीज गेली अन्…

बर्मा बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी भारतीय रेल्वेने बांधला जगातील सर्वात उंच रेल्वे ट्रॅक

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.