AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्मा बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी भारतीय रेल्वेने बांधला जगातील सर्वात उंच रेल्वे ट्रॅक

हा पूल आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. जिरीबाम इम्फाळच्या 111 किलोमीटर लांबीच्या मार्गावर नोनी जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या या पुलाची उंची 141 मीटर आहे. 703 मीटर लांबीच्या या पुलाला 9 सपोर्टिंग पिलर बांधण्यात आले आहेत. ते तयार करण्यासाठी 11,780 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

बर्मा बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी भारतीय रेल्वेने बांधला जगातील सर्वात उंच रेल्वे ट्रॅक
Highest Railway track
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 7:00 AM
Share

भारतीय रेल्वे प्रवासी सेवेसाठी तसेच मालवाहतूक कॉरिडॉर आणि मालगाडी वाहतुकीसाठी ओळखली जाते. याशिवाय, भारतीय रेल्वे नव-नवीन प्रकल्पांसह आपल्या सेवांमध्ये सुधारणा करत असते. भारतीय रेल्वे आता जगातील सर्वात उंच घाट पूल बांधत आहे. भारतीय रेल्वे मणिपूरमधील झिरिगाम आणि इंफाळ दरम्यान नोनी जिल्ह्यात जगातील सर्वात उंच घाट पूल बांधण्याचे काम करत आहे. हा पूल जगातील सर्वात उंच पिअर ब्रिज असेल जो 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

एनएफआरच्या या पिअर ब्रिजचे मुख्य अभियंता संदीप शर्मा म्हणाले की, हा पूल रेल्वेने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला आहे. 703 मीटर लांबीच्या या पुलाला 9 सपोर्टिंग पिलर बांधण्यात आले आहेत. ते तयार करण्यासाठी 11,780 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जिरीबाम इम्फाळच्या 111 किलोमीटर लांबीच्या मार्गावर नोनी जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या या पुलाची उंची 141 मीटर आहे.

ब्रह्मदेशाच्या सीमेजवळ हा पूल आहे

हा पूल आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे.हा पूल आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे.हा पूल आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. इंफाळची रेल्वे कनेक्टिव्हिटी अद्याप येथे नाही. मणिपूरमध्ये जिरीबामपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. जिरीबाम ते इम्फाळ असा कारने प्रवास केल्यास किमान 10 तास लागतात, मात्र हा रेल्वे मार्ग सुरू झाल्याने अवघे 111 किलोमीटरचे अंतर सुमारे 2 ते अडीच तासांत पूर्ण होणार आहे. या ट्रॅकच्या उभारणीमुळे ब्रह्मदेशाची सीमा रेल्वे नेटवर्कच्या अगदी जवळ येईल, ज्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट होतील. रेल्वेच्या दृष्टीकोनातून कोणतेही लष्करी साहित्य आणायचे असेल किंवा घेऊन जायचे असेल तर ते या मार्गाने सहज वापर करता येईल.

रेल्वे ईशान्येकडील भागातून सीमा ओलांडण्याच्या तयारीत आहे. नेपाळ, ब्रह्मदेश, भूतान आणि बांगलादेश या देशांत रेल्वे रुळ टाकण्याची योजना आहे. बांगलादेशला जोडणारा हल्दीबारी ट्रॅक पूर्ण झाला आहे. महिमाशहाली-आगरतळा याला ट्रॅकने जोडण्यात येणार आहे. जोगबनी ते बिहारमधील विराटनगरला जोडण्याचे काम सुरू झाले आहे. याशिवाय, भूतानच्या हाशिमारा सीमेवरही ट्रॅकचे काम सुरू आहे.

इतर बातम्या

डिसेंबरपासून LPG सबसिडी पूर्ववत होणार; कोणाला फायदा मिळणार?

आता 4 कोटी लोकांना WhatsApp त्यांच्या पेमेंट सेवेनं जोडणार, NPCI ची मंजुरी

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.