AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकरी चळवळीतील बांडगुळ पहिले… प्रकाश आंबेडकर यांचा कुणावर हल्लाबोल?

जरांगे पाटील म्हणाले की, मी निवडणूक लढणार. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढली तर ही त्यांची राजकीय भूमिका असेल. शरद पवार म्हणले की, महाराष्ट्राचे मणिपूर होईल. एकीकडे मराठा तर दुसरीकडे ओबीसी आहेत, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आंबेडकरी चळवळीतील बांडगुळ पहिले... प्रकाश आंबेडकर यांचा कुणावर हल्लाबोल?
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 07, 2024 | 8:48 PM
Share

आम्ही ज्यावेळी ही यात्रा काढली त्यावेळी बरीच नावे ठेवली गेली. स्वतःला काहीसुचत नाही म्हणून दुसऱ्यावर टीका केली जाते हे मी गेली 40 वर्ष बघत आहे. यामध्ये आंबेडकरी चळवळीतील बांडगुळ सर्वात आघाडीवर असतात हे लक्षात घ्या. ही बांडगुळं पाकिटछाप बांडगुळं आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर आरक्षण बचाव यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधताना ही टीका केली.

आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे त्याला राजकीय वळण लागू नये. यासाठी आम्ही आधीपासून प्रयत्न करत होतो. ही आरक्षण बचाव यात्रा जेव्हा नियोजित केली, ती पक्ष म्हणून नाही तर सामाजिक जबाबदारी म्हणून राहिली पाहिजे, त्याला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

100 ओबीसी आमदार निवडून आणा

आपल्याला इथून पुढे लढाई जिंकायची असेल, तर आपल्याला 100 ओबीसी आमदार निवडून आणावे लागतील. आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका न घेतल्याने समाजानेच भूमिका घेतल्या आहेत. आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका घेतली असती तर गावागावांतील समाजात फूट पडली नसती. मी खात्रीने सांगतो की, जरांगे पाटील यांनी जरी म्हटलं की, मी निवडणूक लढतो तरी हे राजकीयच भांडण असेल, सामाजिक होणार नाही, असं आंबेडकर म्हणाले.

हेच आरक्षणाचे फलित

या आरक्षण बचाव यात्रेचे फलित काय असेल, तर छगन भुजबळ म्हणाल्याप्रमाणे 1977 ची परिस्थिती आणि शरद पवार म्हणाल्याप्रमाणे मणिपूरसारखी परिस्थिती इथे होऊ शकत नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितलं.

जरांगेंच्या मागणीला पाठिंबा नव्हताच

जरांगे पाटील यांना जेव्हा मी भेटलो तेव्हाही त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा नव्हता आणि आजही नाही. मी तेव्हाही सांगत होतो की, तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षण मागत आहात त्या पद्धतीने मिळणारच नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न मंडल आयोगामध्ये आला होता तेव्हा मराठा समाजातील जो वर्ग होता तो फरक करायला तयार नव्हता. जरांगे पाटील यांना निवडणुकीत भाग घेऊद्या. ती चांगली गोष्ट असेल महाराष्ट्र 169 कुटुंबातून मुक्त होईल असे ॲड. आंबेडकरांनी नमूद केले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.