AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; म्हणाले, दहशत निर्माण करण्याचा…

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : आरक्षण बचाव यात्रा समारोपीय सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केलं. तेव्हा मनोज जरांगे यांचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. आंबेडकर काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मनोज जरांगेंचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; म्हणाले, दहशत निर्माण करण्याचा...
मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर
| Updated on: Aug 07, 2024 | 6:46 PM
Share

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली. या यात्रेनिमित्त आंबेडकर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं नाव त्यांनी घेतलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती का झाली? राजकीय पक्षांनी भूमिका न घेतल्याने झाली. पश्चिम महाराष्ट्र देखील फूट दिसते. याची तीव्रता मराठवाड्यात आहे. इतर जिल्ह्यात देखील आहे. निवडणुकांमध्ये मराठा सामाज आपल्याला दाखवून देईल म्हणतात. हे म्हणतात की आम्ही ओबीसी समाजाला मतदान करणार नाही. ओबीसी म्हणतात ती आम्ही मराठ्यांना मतदान करणार नाही. 14 पासून 29 तारखेपर्यंत मनोज जरांगे भूमिका घेतील असा सांगतायेत. त्यावेळी काय होतं ते पाहू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जरांगेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका

मनोज जरांगे यांची मागणी मराठ्यांना ओबीसमधून आरक्षण दिलं पाहिजे, अशी आहे. सागे सोयऱ्यांना आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत राजकीय पक्षांनी भूमिका घेण्यापेक्षा समाजाने भूमिका घेतली आहे. आम्ही यात्रा काढली. तेव्हा आम्हाला नावं ठेवली गेली. 40 वर्षांचा मला अनुभव आहे. यात आंबेडकर चळवळीतील बां#X@ समोर असतात. यात पाकिटचे बांडगुळ असतात. जरांगे यांनी म्हटलं निवडणूक लढतो जे राजकीय भांडण राहील सामजिक भांडण होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबई, पुणे, कोल्हापूर याठिकाणी पावसाची परिस्थिती होती. ही यात्रा कशी सफल होईल? यासाठी लोक सहभागी होत होते. आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. त्याला राजकीय रंग लागतं कामा नये. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जे जे आरक्षणातील होल्डर छगन भुजबळ आणि काँग्रेस इतरांना निमंत्रण दिलं होतं. उद्देश हा होता ही, आरक्षणाबाबत जागृतता यावी…, असंही ते म्हणाले.

आरक्षण हा सामाजिक प्रश्न- आंबेडकर

दोन्ही बाजूने लग्नावर बहिष्कार होत होता. आजही आम्ही म्हणतो की आरक्षण हा सामाजिक प्रश्न राहिला आहे. राजकीय जरी असला तरी त्याचा तोडगा निघाला पाहजे. त्यांना बोलावलं. पण दुर्दैव असं की कुणी राजकीय भूमिका घ्यायला कुणी तयार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.