AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत लसीकरणाला नागरिकांचा संथ प्रतिसाद, महापालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार

आजवर शहरात पाच लाख 81 हजार 357 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिलाच डोस पूर्ण केला. 3 लाख 39 हजार 660 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आगामी काळात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सव्वा लाख लोकांसाठी अडीच लाख लसींची आवश्यकता आहे.

औरंगाबादेत लसीकरणाला नागरिकांचा संथ प्रतिसाद, महापालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार
औरंगाबादेत विविध ठिकाणी केंद्र सुरु करूनही नागरिकांचा लसीकरणाला संथ प्रतिसाद
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 10:53 AM
Share

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर औरंगाबादकरांनी लसीकरणाकडेही (vaccination in Aurangabad) दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. शहरातील असंख्य नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असला तरीही दुसऱ्या डोसचे गांभीर्य अनेकांना नाही, असेच चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसींचा तुटवडा झाला होता, मात्र लस मिळण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. आता मात्र महापालिकेकडे (Aurangabad Municipal corporation) लसींचा साठा पडून असला तरीही नागरिक लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून आता घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. सणासुदीचा काळ सुरु असल्याने महापालिकेने आता शहरातील मॉल्समध्येही (Vaccine in Malls) लसीकरण केंद्र उभारली आहेत. तसेच हायकोर्टातही लस मिळण्याची सुविधा दिली आहे.

 सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण बाकी

16 जानेवारीपासून औरंगाबाद शहरात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. दुसरी लाट सुरू असताना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र त्या वेळी लसींचा तुटवडा होता. त्यामुळे मनपाच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागला. दुसरी लाट ओसरताच कोरोना लस घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली. आता लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात मिशन कवच कुंंडल मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मनपाने शहरात 21 खासगी रुग्णालयांच्या ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून लसीकरणाला काहीशी गती प्राप्त झाली आहे. सोबतच आरोग्य विभागाने हायकोर्टासह शहरातील प्रमुख चार मॉलच्या ठिकाणीदेखील 20 ऑक्टोबरपासून लसीकरण केंद्र सुरू केले आहे. सद्य:स्थितीत मनपाने निश्‍चित केलेल्या 10 लाख 55 हजार 600 नागरिकांच्या लसीकरणापैकी 19 ऑक्टोबरपर्यंत 9 लाख 21 हजार 17 जणांनी लस घेतली आहे.

कोणत्या भागात कमी लसीकरण?

शहाबाजार, जुना बाजार, जिन्सी, नेहरूनगर, सादातनगर, गणेश कॉलनी, कैसर कॉलनी, गरमपाणी, सिल्कमिल कॉलनी, भावसिंगपुरा या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सिडको एन-8, सिडको एन-11, बन्सीलालनगर, राजनगर, जवाहर कॉलनी, क्रांती चौक, अंबिकानगर, मसनतपूर, नक्षत्रवाडी, पुंडलिकनगर या भागातील केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण झाल्याची माहिती मनपातून देण्यात आली.

दोन डोस पूर्ण झालेल्यांची संख्या किती?

आजवर शहरात पाच लाख 81 हजार 357 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिलाच डोस पूर्ण केला. 3 लाख 39 हजार 660 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आगामी काळात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सव्वा लाख लोकांसाठी अडीच लाख लसींची आवश्यकता आहे. सोबतच दुसरा डोस बाकी असलेल्यांसाठी सुमारे पाच लाख लसी लागतील. त्यामुळे एकूण 8 लाखांच्या आसपास लसींची गरज आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

इतर बातम्या-

जे मलेशिया, सिंगापुरात ते थेट औरंगाबादला, जळगावला जाणाऱ्या वाहनांसाठी 2 कि.मी. भुयारी मार्ग

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.