AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत लसीकरणाला नागरिकांचा संथ प्रतिसाद, महापालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार

आजवर शहरात पाच लाख 81 हजार 357 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिलाच डोस पूर्ण केला. 3 लाख 39 हजार 660 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आगामी काळात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सव्वा लाख लोकांसाठी अडीच लाख लसींची आवश्यकता आहे.

औरंगाबादेत लसीकरणाला नागरिकांचा संथ प्रतिसाद, महापालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार
औरंगाबादेत विविध ठिकाणी केंद्र सुरु करूनही नागरिकांचा लसीकरणाला संथ प्रतिसाद
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 21, 2021 | 10:53 AM
Share

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर औरंगाबादकरांनी लसीकरणाकडेही (vaccination in Aurangabad) दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. शहरातील असंख्य नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असला तरीही दुसऱ्या डोसचे गांभीर्य अनेकांना नाही, असेच चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसींचा तुटवडा झाला होता, मात्र लस मिळण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. आता मात्र महापालिकेकडे (Aurangabad Municipal corporation) लसींचा साठा पडून असला तरीही नागरिक लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून आता घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. सणासुदीचा काळ सुरु असल्याने महापालिकेने आता शहरातील मॉल्समध्येही (Vaccine in Malls) लसीकरण केंद्र उभारली आहेत. तसेच हायकोर्टातही लस मिळण्याची सुविधा दिली आहे.

 सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण बाकी

16 जानेवारीपासून औरंगाबाद शहरात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. दुसरी लाट सुरू असताना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र त्या वेळी लसींचा तुटवडा होता. त्यामुळे मनपाच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागला. दुसरी लाट ओसरताच कोरोना लस घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली. आता लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात मिशन कवच कुंंडल मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मनपाने शहरात 21 खासगी रुग्णालयांच्या ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून लसीकरणाला काहीशी गती प्राप्त झाली आहे. सोबतच आरोग्य विभागाने हायकोर्टासह शहरातील प्रमुख चार मॉलच्या ठिकाणीदेखील 20 ऑक्टोबरपासून लसीकरण केंद्र सुरू केले आहे. सद्य:स्थितीत मनपाने निश्‍चित केलेल्या 10 लाख 55 हजार 600 नागरिकांच्या लसीकरणापैकी 19 ऑक्टोबरपर्यंत 9 लाख 21 हजार 17 जणांनी लस घेतली आहे.

कोणत्या भागात कमी लसीकरण?

शहाबाजार, जुना बाजार, जिन्सी, नेहरूनगर, सादातनगर, गणेश कॉलनी, कैसर कॉलनी, गरमपाणी, सिल्कमिल कॉलनी, भावसिंगपुरा या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सिडको एन-8, सिडको एन-11, बन्सीलालनगर, राजनगर, जवाहर कॉलनी, क्रांती चौक, अंबिकानगर, मसनतपूर, नक्षत्रवाडी, पुंडलिकनगर या भागातील केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण झाल्याची माहिती मनपातून देण्यात आली.

दोन डोस पूर्ण झालेल्यांची संख्या किती?

आजवर शहरात पाच लाख 81 हजार 357 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिलाच डोस पूर्ण केला. 3 लाख 39 हजार 660 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आगामी काळात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सव्वा लाख लोकांसाठी अडीच लाख लसींची आवश्यकता आहे. सोबतच दुसरा डोस बाकी असलेल्यांसाठी सुमारे पाच लाख लसी लागतील. त्यामुळे एकूण 8 लाखांच्या आसपास लसींची गरज आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

इतर बातम्या-

जे मलेशिया, सिंगापुरात ते थेट औरंगाबादला, जळगावला जाणाऱ्या वाहनांसाठी 2 कि.मी. भुयारी मार्ग

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र