AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका…

औरंगाबादः घरात लग्न तोंडावर आले असताना मुलगी पळून गेली, त्यामुळे समाजात बदनामी होणार, या भीतीने मुलीच्या बापाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या (Aurangabad suicide) या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. विशेष म्हणजे बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले की, मुलीला पुन्हा घरात घेून का.. या घटनेमुळे […]

औरंगाबादेत हळहळः लग्न तोंडावर, मुलगी पळून गेली, हताश बापाची आत्महत्या, लिहिलं- तिला घरात घेऊ नका...
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 11:16 AM
Share

औरंगाबादः घरात लग्न तोंडावर आले असताना मुलगी पळून गेली, त्यामुळे समाजात बदनामी होणार, या भीतीने मुलीच्या बापाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या (Aurangabad suicide) या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. विशेष म्हणजे बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले की, मुलीला पुन्हा घरात घेून का.. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात (Aurangabad city) हळहळ व्यक्त होत आहे.

पाच दिवसांवर आले होते लग्न

वाहनचालक असलेल्या 48 वर्षीय गृहस्थाने आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. कुटुंबाची बदनामी होईल, या कारणास्तव कुणाचेचे नाव या वृत्तात देण्यात आलेले नाही. सदर गृहस्थाच्या घरात 19 नोव्हेंबर रोजी मुलीचे लग्न ठरले होते. मात्र मुलीचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते, याची माहिती वडिलांना नव्हती. ते मुलीचे लग्न थाटा-माटात करण्याच्या तयारीत होते. सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुलगी घर सोडून निघून गेली. खूप शोधाशोध केल्यानंतर हताश वडिलांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ऐन लग्न तोंडावर आल्यावर मुलीने उचललेल्या पावलामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. हा धक्का सहन न झाल्याने बापाने शनिवारी रात्री थेट संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली.

चिठ्ठीत लिहिलं..तिला घरात घेऊ नका

जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उड्डाण पुलाजवळ धाव घेतली. मृताच्या पँटच्या खिशात त्यांचा एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले होते, ‘मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील, मात्र त्या मुलीला आता माझ्या घरात स्थान नाही’. या मजकुराखाली सदर व्यक्तीने सही केली होती.

इतर बातम्या-

Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.