AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!

फळे आणि पाणी दोन्ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. पण फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर ते पचन प्रक्रियेत अडथळा आणतेच, शिवाय तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही.

Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!
आरोग्य
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 11:02 AM
Share

मुंबई : फळे आणि पाणी दोन्ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. पण फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर ते पचन प्रक्रियेत अडथळा आणतेच, शिवाय तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही. जाणून घ्या फळे खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये.

अपचनाचा त्रास

फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास अपचनाची समस्या होऊ शकते. त्याचे पुढे अॅसिडिटीमध्ये रूपांतर होते. याशिवाय फळातील सर्व पोषक तत्वे शोषली जातात. या सर्वांमुळे तुमच्या शरीरात अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे फळ खाल्ल्यानंतर एक तासाने पाणी प्या.

पीएच पातळी

जेव्हा तुम्ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. विशेषत: टरबूज, काकडी, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांसारखी जास्त पाणी असलेली फळे पाचन तंत्राच्या पीएच पातळीमध्ये व्यत्यय आणतात. हे फळांच्या उच्च पाण्यामुळे होते, ज्यामुळे पीएच पातळीसह समस्या उद्भवू शकतात. परिणामी तुमचे पोट कमी आम्लयुक्त होते. हे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि हे आपल्या शरीराला हानी पोहोचवते.

पोटदुखीची समस्या

फळांमध्ये फ्रक्टोज आणि यीस्टचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल कमी होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. पुढे पोटदुखी, फुगणे अशा समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी फळे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे.

रक्तातील साखर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि प्रणालीचे योग्य कार्य करण्यास विलंब होऊ शकतो. न पचलेले पदार्थ फॅटमध्ये बदलतात, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते. याचा अर्थ ते शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. या कारणामुळे तुम्हाला नंतर मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.