AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगली बातमीः औरंगाबादेत पर्यटन बहरले, लॉकडाऊननंतर सव्वाचार लाख पर्यटकांची वर्दळ

औरंगाबादः कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर औरंगाबादमधील पर्यटकांची (Aurangabad tourism) संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच महिन्यांत देशातील तसेच विदेशातील अनेक पर्यटकांनी ऐतिहासिक औरंगाबाद (Historical Aurangabad) नगरीला भेट दिल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा(Bibi Ka Makbara) , वेरूळ लेणीला 4 लाख 24 हजार 604 भारतीय तर 484 […]

चांगली बातमीः औरंगाबादेत पर्यटन बहरले, लॉकडाऊननंतर सव्वाचार लाख पर्यटकांची वर्दळ
औरंगाबादमध्ये पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्या वाढतेय
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 3:23 PM
Share

औरंगाबादः कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर औरंगाबादमधील पर्यटकांची (Aurangabad tourism) संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच महिन्यांत देशातील तसेच विदेशातील अनेक पर्यटकांनी ऐतिहासिक औरंगाबाद (Historical Aurangabad) नगरीला भेट दिल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा(Bibi Ka Makbara) , वेरूळ लेणीला 4 लाख 24 हजार 604 भारतीय तर 484 विदेशी पर्यटकांनी मागील पाच महिन्यात भेट दिली आहे. यापैकी ग्राहकांचा सर्वाधिक ओढा बीबी का मकबऱ्याकडे दिसून आला. दिवाळीच्या आठ दिवसांच्या सुटीत तब्बल 82 हजार 856 तर 190 विदेशी पर्यटकांनी (Foreign Tourist) येथे भेट दिली. त्यामुळे कोरोना काळानंतर खूपच दिलासादायक चित्र दिसत आहे.

जून महिन्यापासून हळू हळू पर्यटकांमध्ये वाढ

कोरोना संक्रमणामुळे बंद असलेली पर्यटनस्थळे जूनमध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. सुरुवातीला येथील स्थळांवर पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता थंडीचा मौसम सुरु झाल्यापासून पर्यटकांची संख्याही हळू हळू वाढत आहे. जिल्ह्याती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच ऐतिहासिक स्मारकात तिकीट आकारले जाते. त्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात तब्बल 1.20 लाख पर्यटक आले. मकबऱ्यापाठोपाठ दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणीला भेट देमाऱ्यांची संख्या अधिक असून पर्यटकांचा उंचावलेला आलेख या व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक

जून महिन्यापासून औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या हळू हळू वाढत आहे. मात्र ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील 64,606 पर्यटकांनी तर विदेशातील 44 नागरिकांनी पर्यटनस्थळांना भेट दिली. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील पर्यटकांनी एक लाखांचा आकडा पार केला तर विदेशातील 190 पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.

इतर बातम्या-

ED च्या कारवाईने औरंगाबादेत खळबळ, उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरातही धाडसत्र

औरंगाबादः अजिंठा लेणीत खासगी वाहनांना परवानगी, एसटी बससेवा संपामुळे ठप्पच, आतापर्यंत 30 कर्मचारी निलंबित

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.