AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाज्यांनी गाठली शंभरी, औरंगाबादकर हैराण, म्हणतात आता काही दिवस डाळ अन् कडधान्येच खाणार!

काही दिवसांपूर्वी बेभाव विकले जाणारे टोमॅटो आता 80 रुपये किलोच्या घरात जाऊन बसलेत. कोथिंबीरीने तर 40 रुपये जुडीची किंमत पटकावलीय. त्यामुळे सामान्य माणसांना एक भाजी घ्यायची म्हटली शंभरची नोट मोडावी लागतेय.

भाज्यांनी गाठली शंभरी, औरंगाबादकर हैराण, म्हणतात आता काही दिवस डाळ अन् कडधान्येच खाणार!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 22, 2021 | 12:38 PM
Share

औरंगाबादः मागील आठवड्यापासून औरंगाबाद शहरात भाज्यांचे भाव (Vegetable price hike) गगनाला भिडल्याचे चित्र आहे. कोणतीही भाजी 20 रुपये पाव किलो या दराच्या खाली मिळत नाही. बाजारात भाजी आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे (Aurangabad citizens) हे भाव ऐकून अक्षरशः डोळे पांढरे होत आहेत. काही दिवसांपूर्वी बेभाव विकले जाणारे टोमॅटो आता 80 रुपये किलोच्या घरात जाऊन बसलेत. कोथिंबीरीने तर 40 रुपये जुडीची किंमत पटकावलीय. त्यामुळे सामान्य माणसांना एक भाजी घ्यायची म्हटली शंभरची नोट मोडावी लागतेय. आता पुढचे काही दिवस भाज्या स्वस्त होईपर्यंत डाळी आणि कडधान्येच खावीत, असा विचार ग्राहक करतायत.

भाज्यांचे दर काय?

शेवग्याच्या शेंगा- 100 ते 200 रुपये किलो टोमॅटो-80 ते 100 रुपये किलो वांगे- 80 ते 100 रुपये किलो सिमला मिरची- 90 ते 100 रुपये किलो भेंडी- 60 ते 80 रुपये किलो फुलकोबी- 80 ते 100 रुपये किलो गवार- 100 ते 120 रुपये किलो दोडके-70 ते 80 रुपये किलो कारले- 70 ते 80 रुपये किलो कोथिंबीर- 30 ते 40 रुपयांना एक जुडी पालक- 20 रुपये जुडी

का कडाडले भाज्यांचे दर?

परतीच्या मुसळधार पावसाने शेतातील भाज्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक भाज्या जागेवरच खराब झाल्या. याचा परिणाम आता भाजीमंडईत पहायला मिळत आहे. जाधववाडीत भाज्यांची आवक 40 टक्के घटली आहे. भाज्यांचे व्यापारीदेखील त्रस्त आहेत.

आता पुढचे काही दिवस डाळी अन् कडधान्येच!

बाजारात भाजी आणण्यासाठी पिशवी घेऊन निघालेले अनेक नागरिक महागलेले दर ऐकून तसेच परत येत आहेत. कित्येकांनी तर मागील पंधरा दिवसांपासून घरात कोथिंबीरच आणलेली नाही. आता आम्ही भाज्यांचे दर स्वस्त होईपर्यंत केवळ डाळी आणि मूग-मटकी अशा कडधान्यांचेच प्रकार कालवण म्हणून करण्याचे ठरवले आहे, अशी प्रतिक्रिया जयश्री चाळक या गृहिणीने दिली.

आज पाणीपुरवठ्यात अडथळा

महावितरणने पैठणच्या उपविभागांतर्गत चितेगाव परिसरात वीजपुरवठ्यातील तातडीच्या तांत्रिक दुरुस्त्यांसाठी 22 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पाच तासांचा शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे. या काळात जायकवाडीतील महापालिकेच्या पंपगृहांचाही वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरासाठी होणारा पाणी उपसा पूर्णपणे बंद राहील. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून वसाहतींना नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. शटडाऊन काळात मुख्य जलवाहिनी, पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान आवश्यक असलेल्या गळत्यांची व तांत्रिक दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन पालिकेकडून केले जात आहे, अशी माहिती मनपातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.

इतर बातम्या-

काय सांगता ? एकाच वनस्पतीतून टोमॅटो अन् वांग्याचे उत्पादन, दुहेरी फायदा

दादर मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी लोकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या