AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता ? एकाच वनस्पतीतून टोमॅटो अन् वांग्याचे उत्पादन, दुहेरी फायदा

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधकांनी शोधच तसा लावलेला आहे. एकाच वनस्पतीमधून आता टोमॅटो आणि वांग्याचे उत्पादन घेता येणार आहे. आहो खरचं..या दोन्ही भाजीपाल्याची निर्मिती एकाच वनस्पतीमधून होणार आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. कमी जागेत अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. या अनोख्या वनस्पतीचे नाव आहे ब्रिमाटो.

काय सांगता ? एकाच वनस्पतीतून टोमॅटो अन् वांग्याचे उत्पादन, दुहेरी फायदा
आयसीएआर- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चने ब्रिमाटो तयार करण्यासाठी एकत्र काम केले आहे.
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 5:54 PM
Share

मुंबई : शहरी भागातही उपलब्ध जागेत भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र, जागेअभावी उत्पादनावर मर्यादा पडतात. पण आता चिंता करण्याचे कारण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधकांनी शोधच तसा लावलेला आहे. एकाच वनस्पतीमधून आता टोमॅटो आणि वांग्याचे उत्पादन घेता येणार आहे. आहो खरचं..या दोन्ही भाजीपाल्याची निर्मिती एकाच वनस्पतीमधून होणार आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. कमी जागेत अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. या अनोख्या वनस्पतीचे नाव आहे ब्रिमाटो.

भाज्यांची उत्पादनता वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ कलमकरण्याचा अवलंब करत आहेत. एकाच वनस्पतीमध्ये दोन भाज्यांचे कलम केले जाते जेणेकरून दोन्ही फळे एकाच वनस्पतीतून मिळू शकतील. कमी वेळात आणि कमी जागेत भाज्या तयार करण्यासाठी कलम तंत्राने तयार केलेली वनस्पती प्रभावी आहे.

असे केले कलम

आयसीएआर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च, वाराणसी यांनी आता ग्राफ्ड पोमाटो (बटाटा-टोमॅटो) च्या यशस्वी उत्पादनानंतर विविध प्रकारच्या ब्रिमाटोविकसित केल्या आहेत. आयसीएआरच्या सांगण्यानुसार वांग्याचा वाण 25 ते 30 दिवसांचे आणि टोमॅटोचे वाणही 22 ते 25 दिवसांचा असताना त्याचे कलम करण्यात आले होते.

कलम करतानाची काळजी

वांग्याची मुळे – आयसी 111056 वांग्याच्या विविध प्रकारामध्ये 5 टक्के प्रमाण असे आहे की त्यामध्ये कलम करण्याची प्रक्रिया करता येते. त्यानुसार बाजू / विभाजन पद्धतीनुसार हे कलम करण्यात आले होते, ज्यामध्ये मुळ आणि स्कोन या दोन्ही ठिकाणी 5 ते 7 मिमी (४५ डिग्री कोन) तिरके काप केले गेले. कलम केल्यानंतर लगेचच, लागवड केलेला प्रकल्प नियंत्रित वातावरणीय अवस्थेत ठेवण्यात आले. जिथे तापमान, आर्द्रता आणि प्रकाश पहिले 5 ते 7 दिवस समप्रमाणात ठेवण्यात आला होता. त्यानंतर 5 ते 7 दिवस अर्धवट ऊन आणि अर्धवट सावलीत ठेवण्यात आले.

व्यावसायिक उत्पादनावर संशोधन अजूनही सुरू आहे

वाराणसीयेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम ऑपरेशननंतर 15 ते 18 दिवसांनी या क्षेत्रात कलम वनस्पतींचे प्रत्यारोपण करण्यात आले. सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्यात, वांग्याच्या आणि टोमॅटोच्या दोन्ही वंशजांमध्ये संतुलित विकास राखण्याची खबरदारी घेण्यात आली. याशिवाय कलम केलेल्या ठिकाणी काही अडचण असल्यास ती ताबडतोब काढून टाकण्यात आली.

व्यवसायिक उत्पादनाच्या दृष्टीने संशोधन सुरुच

लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी टोमॅटो आणि वांग्याची दोन्ही फळे वनस्पतीतून येऊ लागली. याच वनस्पतीतून 2.383 किलो टोमॅटो आणि 2.64 किलो वांगे लागलेली आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, शहरी आणि उपनगरीय भागांसाठी कलम तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरेल. पॉटमध्ये एकाच वनस्पतीतून दोन भाज्या तयार केल्या जाऊ शकतात. वाराणसीच्या आयसीएआर-आयव्हीआर येथे कलम केलेल्या ब्रिमाटोच्या व्यावसायिक उत्पादनावर अद्याप संशोधन सुरू आहे. (ICAR discovery, production of two vegetables from the same plant, double benefit)

संबंधित बातम्या :

पावसात भिजलेल्या सोयाबीनची काढणी- मळणीच महत्वाची, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

मोहरीने मिळेल उभारी ; दरात 400 रुपयांची वाढ, लागवडीसाठीही पोषक वातावरण

शेतातले सोयाबीन थेट बाजारात, लातूरात आवक दुपटीने वाढली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.