AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | वाळूज ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान, महासंचालकांची घोषणा

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यातील पोलीस (Maharashtra police) ठाण्यांची निवड आधी करण्यात आली आहे. त्यात वाळूज पोलीस स्टेशनचा सर्वात प्रथम क्रमांक लागला आहे.

Aurangabad | वाळूज ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान, महासंचालकांची घोषणा
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 3:10 PM
Share

औरंगाबादः वाळूज पोलीस स्टेशन हे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन (Best police station) ठरले आहे. 11 फेब्रुवारी रोजी राज्य पोलीस विभागाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने एका पत्राद्वारे यासंबंधीची घोषणा करण्यात आली. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांकडून (police commissioner) विविध ठाण्यांच्या कामकाजाविषयीचे अहवाल मागवण्यात आले होते. या सर्वांची पडताळणी केल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातलं सर्वात उत्कृष्ट पोलीस स्टेशन निवडण्यासाठी विविध निकष लावण्यात आले होते. देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यातील पोलीस (Maharashtra police) ठाण्यांची निवड आधी करण्यात आली आहे. त्यात वाळूज पोलीस स्टेशनचा सर्वात प्रथम क्रमांक लागला आहे.

राज्यात पहिला येण्याचा मान

राज्यातील पोलीस ठाण्यांमधील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनची निवड करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष लावले जातात. अर्थात यामागे विविध ठाण्यांमधील निकोप स्पर्धा वाढीस लागावी, हाच उद्देश असतो. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध, दोषसिद्धी यात सुधारणा व्हावी, याकरिता देश पातळीवर 10 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड केंद्रीय गृहमंत्रालयातून करण्यात येते. या प्रक्रियेत राज्यातील ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवणे, गुणवत्ता वाढवणे, दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट रितीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हा तपास आदी हेतू साध्या करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्यांची निवड करून सदर पोलीस ठाण्यांना सन्मान चिन्ह व रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

राज्यातली पाच सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणी कोणती?

पहिले- वाळूज पोलीस स्टेशन आणि दुसरे- यवतमाळ पोलीस स्टेशन तिसरे- जालन्यातील सेवली पोलीस स्टेशन चौथे- सोलापूरमधील जोडभावी पोलीस स्टेशन पाचवे- अहमदनगर येथील राजूर पोलीस स्टेशन अशी क्रमवारी राज्य पोलीस विभागाच्या वतीने जारी करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Zodiac | कोणाचं ऐकतील तर शपथ! असेच असतात या राशीचे लोक, कुठे तुमची रास तर यामध्ये नाही ना ?

Hijab Row: हिजाब आंदोलनाचं लोण कल्याणमध्येही, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या निदर्शनावेळी राडा; महिला आपसात भिडल्या

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.