AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Weather: शहरात आज वातावरण ढगाळ, कुठे ऊन-कुठे सावली, पुढच्या आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता नाही

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोरही कमी झालेला दिसून येईल.

Aurangabad Weather: शहरात आज वातावरण ढगाळ, कुठे ऊन-कुठे सावली, पुढच्या आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता नाही
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 5:34 PM
Share

औरंगाबाद: मंगळवारी ढगफुटीचा हाहाकार झेललेल्या औरंगाबादकरांना (Heavy Rainfall in Aurangabad) काहीसा दिलासा मिळणारी बातमी आहे. शहर आणि परिसरातला पावसाचा जोर कमी झाला असून पुढील आठवड्यातही मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही. आज गुरुवारी शहराचे हवामान ढगाळ होते. तर कुठे ऊन आणि सावलीचा खेळ सुरु होता. पण एकूणच वातावरण मोकळे असल्याने सण-उत्सवाकरिता खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता आले. शहर आणि परिसरात आज काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाचे थेंब आले. पण कुठेही पावसाचा जोर दिसून आला नाही.

पुढच्या आठवड्यात मोठा पाऊस नाही

हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोरही कमी झालेला दिसून येईल. आज दिनांक 9 सप्टेंबरपासून ते पुढील आठवड्यापर्यंत म्हणजेच 17 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच मोठा पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे. अर्थात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तसेच 16 आणि 17 सप्टेंबर या दोन दिवसात पूर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यात हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांचा समावेश असेल.

ढगफुटीने औरंगाबादचं अवसान गळालं

ऐन गणपती-गणेशोत्सव तोंडावर आला असताना औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला. ठिकठिकाणी नालेसफाई, रस्ता दुरुस्तीची खोळंबलेली, अर्धवट राहिलेल्या कामांमुळे शेकडो घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले. महापालिकेने दुसऱ्या दिवशी काही ठिकाणची पाहणी करून तिथे तात्पुरती मलपमट्टी केली असली तरीही या आसमानी संकटातून कसे सावरायचे हाच प्रश्न नागरिकांना सतावत आहे. ग्रामीण भागात तर घर-संसारासह अवघी शेतंही वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

शहरात मंगळवारचा पाऊस ढगफुटीपेक्षाही भयंकर

मंगळवारी शहरात ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनिटात म्हणजे 7:40 मिनिटापर्यंत पाऊस पडण्याचा सरासरी वेग हा 166:75 मिमी असा नोंदवला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत 56:2 मिमी पावसाची नोंद झाली. सामान्यपणे ढगफुटीदरम्यान ताशी 100 मिमी वेगाने पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हटली जाते. मात्र कालचा पाऊस त्यापेक्षा जास्त वेगाने होता. रात्री 7.40 नंतर पावसाचा वेग थोडा कमी होत गेला. 07:50 पर्यंत सरासरी 86:9 मी मी वेग होता व नंतर 08:10 वाजेपर्यंत तो कमी होत 53:24 मीमी प्रति तास पावसाचा वेग राहिला. तर सायंकाळी 07:10 ते 08:10 या एका तासात 87.6 मी. मी. औरंगाबाद शहरात पावसाची नोंद झाली. (Weather forecast, rain update in Aurangabad Marathwada region, Maharashtra)

इतर बातम्या-

Marathwada Weather Update: मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार, ऑरेंज ॲलर्ट जारी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Aurangabad Weather Update: मराठवाड्यात बीड-जालन्याला पावसाने चांगलेच झोडपले, पुढचे दोन दिवसही दमदार बरसणार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.