AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडूंची बळीराजाला साथ; शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवरून दिल्लीकडे कूच

बच्चू कडू यांनी शुक्रवारी (4 डिसेंबर) दुचाकीने दिल्लीकडे कूच केले आहे. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत.

बच्चू कडूंची बळीराजाला साथ; शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवरून दिल्लीकडे कूच
| Updated on: Dec 04, 2020 | 10:44 PM
Share

अमरावती : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. महिला आणि बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध केला आहे. त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी (4 डिसेंबर) दुचाकीने दिल्लीकडे कूच केले आहे. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत. (Bacchu Kadu going to Delhi by bike for supporting the farmers)

केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातही प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

बच्चू यांचे दिल्लीकडे कूच

बच्चू कडू जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत. गुरुकुंज मोझरी ते दिल्ली असा प्रवास ते दुचाकीने करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते तसेच शेतकरीही आहेत. दिल्लीकडे दुचाकीने जाणार आहेत. अमरावतीहून थेट दिल्लीला जाऊन ते दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविणार आहेत.

पंतप्रधानांना शेतकऱ्यांची भेटायला वेळ नाही

दरम्यान, “शेतकऱ्यांना भेटायला पंतप्रधान, सरकार यापैकी कुणालाही वेळ नाही. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही; तोपर्यंत आम्ही दिल्लीला आंदोलन करु,” असे बच्चू कडू 2 डिसेंबर रोजी म्हणाले होते. तसेच, यावेळी त्यांनी शुक्रवारी (4 डिसेंबर) अमरावती येथून दुचाकीवरून मोर्चाला सुरुवात करण्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्रातून हा मोर्चा नेऊन दिल्लीतील किसान मोर्चाला समर्थन करू, असेही त्यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या :

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस, राज्यात शेतकरी संघटनांचं उग्र आंदोलन, तर प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचा एल्गार

PHOTO | दिल्लीत आंदोलनाचा सातवा दिवस; शेतकरी काय खातात, कुठे झोपतात?

दिल्लीनंतर महाराष्ट्रातही शेतकरी संघटनांचा राज्यव्यापी एल्गार, 3 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार

(Bacchu Kadu going to Delhi by bike for supporting the farmers)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.