AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास, कारण काय?

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती.

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास, कारण काय?
राज्यमंत्री बच्चू कडूImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 4:32 PM
Share

अमरावती: राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार (chandurbazar) प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा (vidhansabha) सदस्यपद रद्द करा, अशी मागणी याचिकाकर्ते तिरमारे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता बच्चू कडू उच्च न्यायालयात जाण्यार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

चुकीच्या निर्णयाचे स्वागत

विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

राज्य शासनाने आमदारांची एक सोसायटी गठीत करून घरासाठी कर्ज दिले होते. हेच ते घर असून 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम आम्ही नोंदवली होती. मात्र घर क्रमांक देण्यास विसरलो होतो. हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने वचपा काढण्यासाठी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खरं तर न्यायालयाने या प्रकरणात चुकीचा निर्णय दिला आहे, असं ते म्हणाले.

वरच्या न्यायालयात जाऊ

न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करत असलो तरी आता आम्हाला जामीन मिळाला असून वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत. वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

संजय राऊत तुम्ही फडणवीसांच्या घराबाहेर याच आम्ही बघू, भाजपचं राऊतांना थेट आव्हान

Vaidehi Parashurami : वैदेही परशुरामी झाली ‘गुलाबो’, Weekend mood मधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

UP Elections | उत्तर प्रदेशात मतदानानंतर गाडीत आढळले EVM, कैराना येथे खळबळ, तपासानंतर काय उघड झालं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.