AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेळ आली तर बलिदान….लाडकी बहीण…बच्चू कडूंचा इशारा; अन्नत्याग आंदोलनामुळे सरकार टेन्शमध्ये!

बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

वेळ आली तर बलिदान....लाडकी बहीण...बच्चू कडूंचा इशारा; अन्नत्याग आंदोलनामुळे सरकार टेन्शमध्ये!
bacchu kadu
| Updated on: Jun 08, 2025 | 6:16 PM
Share

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांनी सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचं अस्त्र उपसलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीला घेऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. मोझरी येथे ते या आदोलनाला बसले आहेत. दरम्यान, लोकांच्या डोक्यात हिदू-मुस्लीम द्वेष पेरला जात आहे. मी बलिदान द्यायला तयार आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

आमच्या जीवन मरणाचा प्रश्न…

अन्नत्याग आंदोलनाला बसलेले असताना बच्चू कडू यांनी भाषम केले. यावेळी बोलताना देशातील शेतकरी नेते राकेश टिकेत उद्या इथे येणार आहेत. देशात आता जातीय रंग देण्याचा काम केलं जातंय. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटवला गेला. त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. आमच्या डोक्यात हिंदू-मुस्लीम द्वेष टाकला जात आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडू यांचे आंदोलन आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहला पाहिजे ही व्यवस्था मोडून काढायची आहे. आमच्या बियाण्याचे भाव का कमी झाले नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

शेतकऱ्यांच्या मालाचा भाव…

तसेच मत विकायला लाडकी बहीण सुरू केली. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत. सरकार सत्तेवर यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्याच काळात मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला होता. सरकारला माहीत आहे की बच्चू कडू मेला तरी फ़रक पडत नाही. कारण त्यांनी जाती धर्मात लोकांना गुंतवणूक ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

दरम्यान, आजपासून बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू झाले आहे. शेतकरी, अपंग, शिक्षक, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते या आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची सरकार कशी दखल घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.