AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझा भाऊ गेला, त्याला शेवटचं पाणीही दिलं नाही…”, संतोष देशमुखांच्या बहिणीच्या अश्रूंना नाही खळ, टाहो फोडत म्हणाली…

संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चा काढला जात आहे. आज धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांची बहीण प्रियांका चौधरी सहभागी झाल्या होत्या.

माझा भाऊ गेला, त्याला शेवटचं पाणीही दिलं नाही..., संतोष देशमुखांच्या बहिणीच्या अश्रूंना नाही खळ, टाहो फोडत म्हणाली...
संतोष देशमुखImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 11, 2025 | 2:57 PM
Share

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच आता नुकतंच याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. यामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चा काढला जात आहे. आज धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांची बहीण प्रियांका चौधरी सहभागी झाल्या होत्या.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या मोर्चापूर्वी संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी हळहळ व्यक्त केली. “मुख्यमंत्रीसाहेब कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि त्यांना फाशी द्या”, अशी मागणी प्रियांका चौधरी यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कळकळीची विनंती…

“मला मुलांसाठी मोर्चात सहभागी व्हावे लागतं आहे. भाऊ तर गेला त्याला शेवटचे पाणी सुद्धा दिलं नाही. त्याने मला मरता मरता वाचवलं आहे. फक्त या चिमुकल्यासाठी मी बाहेर पडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कळकळीची विनंती आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि त्यांना फाशी द्या”, असे प्रियांका चौधरी म्हणाल्या.

“माझा देव घरात होता, पण मी ओळखू शकले नाही”

“आज मुलांचे शिक्षणाचे वय आहे. त्यांच्यावर जर वेगळा परिणाम झाला तर जबाबदार कोण? मी माझ्या भावासाठी काहीच करू शकले नाही. तोच माझा आधार होता, तोच माझा देव होता, तोच माझा आनंद होता. आमचा आनंद गेला. आता जगण्याची पण इच्छा नाही, फक्त चिमुकल्यांसाठी तळमळ वाटते. सत्य वागणं, जगणं पाप आहे का? म्हणजे काय सत्य वागायचं नाही का? सत्यासाठी जगायचं नाही का? तो स्वतःसाठी कधी जगला नाही. माझा देवावर विश्वास आहे, माझा देव घरात होता, पण मी ओळखू शकले नाही. देवाजवळ देर है, अंधेरे नही है”, असेही प्रियांका चौधरींनी सांगितले.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष