Ahmednagar-Ashti Railway : नगर-आष्टी रेल्वेला आजपासून सुरुवात! काय आहे या रेल्वेची खासियत? जाणून घ्या

Ahmednagar Ashti Railway : नव्या रेल्वेमुळे आष्टी-नगर पट्ट्यातील प्रवाशांना आणि नागरिकांना फायदा होईल. तसंच स्थानिक व्यापार आणि उद्योगांनाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

Ahmednagar-Ashti Railway : नगर-आष्टी रेल्वेला आजपासून सुरुवात! काय आहे या रेल्वेची खासियत? जाणून घ्या
बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं आज उद्घाटनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 6:18 AM

कुणाल जायकर, प्रतिनिधी, अहमदनगर : बहुप्रतिक्षित नगर-आष्टी रेल्वेच्या (Ahmednagar Ashti Railway) उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. या रेल्वेचा सर्वात मोठा फायदा नगर आणि बीड (Beed) या दोन जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे. आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेते एकाच मंचावर असणार आहेत. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. शिवाय पंकजा मुंडे देखील या उद्घाटन सोहळ्यासाठी हजेरी लावण्याची शक्यताय.

आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. फुलांची सजावट, व्यासपीठ, या सह अनेक गोष्टी आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तयार करण्यात आल्या. या उद्घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नेमकं काय म्हणतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

नगर-आष्टी रेल्वे मार्गाचं वैशिष्ट्य काय?

अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्ग वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचा रेल्वे मार्ग ठरणार आहे. एकूण 66 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग आहे. हा रेल्वेमार्ग अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारनेही 50-50 टक्के खर्चाचा वाटा उचलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

उद्योगाला चालना

नव्या रेल्वेमुळे आष्टी-नगर पट्ट्यातील प्रवाशांना आणि नागरिकांना फायदा होईल. तसंच स्थानिक व्यापार आणि उद्योगांनाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. मराठवड्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला या रेल्वेमुळे गती येणार आहे.

किती वाजता सुटणार?

अहमदनगर ते आष्टी ही डेमू ट्रेन नगरहून सकाळी 07 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि आष्टी येथे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. दुसरीकडे ही रेल्वे सकाळी 11 वाजता आष्टीवरून सुटून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी नगरला पोहोचेल. रविवार वगळता दररोज ही रेल्वे सेवा सुरु राहणार आहे. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.