AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST चा बंद जीवघेणा,आता तरी तोडगा निघावा, बीडमध्ये मालवाहू रिक्षातून विद्यार्थ्यांचा प्रवास!

दिवाळीपासून सुरु असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपता सपत नाहीय. त्यातच शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचेही हाल होत आहेत. बस बंद असल्याचा फटका ग्रामीण भागाला जास्त बसतोय.

ST चा बंद जीवघेणा,आता तरी तोडगा निघावा, बीडमध्ये मालवाहू रिक्षातून विद्यार्थ्यांचा प्रवास!
एसटी बस बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 24, 2021 | 4:00 PM
Share

बीडः राज्य शासनात विलीनीकरणासाठी सध्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरु आहे. यामुळे लहान मोठ्यांसह सर्वच प्रवाशांचे हाल होत आहेत. या संपाचा फटका अनेकांना बसत असून ग्रामीण पातळीवर गंभीर परिणामही पहायला मिळत आहेत. संपाचे परिणाम दाखवणारे बीडमधील (Beed District) पाटोदा तालुक्यातील सौताडा गावातील विद्यार्थ्यांचे (School student) हे बोलके चित्र. दिवाळीच्या सुट्यांनतर येथील शाळा सुरु झाल्या. सौताड्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जामखेड येथील शालेत जातात. एरवी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी एसटी बसचा वापर करतात. मात्र सध्या एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. खासही वाहनांनी अशा प्रकारे प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे आता तरी हा संप, यातील राजकारण थांबावं, अशी लोकभावना आहे.

मालवाहू रिक्षात 25 ते 30 विद्यार्थी

एसटी बस सुरु नसल्याने गावोगावच्या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी फारशी वाहने नव्हती. उशीर होत असल्याने एका मालवाहू रिक्षात 25 ते 30 विद्यार्थी-विद्यार्थिनी दाटीवाटीने उभ्या होत्या.

टपावर पाच विद्यार्थी, घाटाचा रस्ता

अधिक गंभीर बाब म्हणजे जामखेडहून सौताड्याला जाताना पाच किमी अंतरावर तीव्र घाटरस्ता आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी ही जोखी स्वीकारत असले तरीही प्रवासाचे हे दृश्य पालकांची चिंता वाढवणारे आहे. राज्यात 35 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एसटी बसचा वापर करतात. मात्र सध्या सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांनी शिकण्यासाठी शाळेत जावे की नाही, हा प्रश्न आहे.

इतर बातम्या-

दंगल कव्हर करताना… अमरावती हिंसाचार : वस्तुस्थिती आणि परिणाम सांगणारा गजानन उमाटे यांचा थरारक अनुभव, नक्की वाचा

VIDEO: विलीनीकरण की पगारवाढ? एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शरद पवारांनी अडचणी-पर्याय सविस्तर सांगितले

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...