AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कैद्यांना शिक्षा देणारा आंबागड किल्ला स्वतः भोगतोय शिक्षा, मुलभूत सुविधांची वानवा, प्रशासनाची दुर्लक्षामुळे किल्ल्याची दुरावस्था

तुमसरपासून 15 किलोमीटर, जिल्हा मुख्यालयापासून 45 किलोमीटर व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर आंबागड किल्ला आहे.

कैद्यांना शिक्षा देणारा आंबागड किल्ला स्वतः भोगतोय शिक्षा, मुलभूत सुविधांची वानवा, प्रशासनाची दुर्लक्षामुळे किल्ल्याची दुरावस्था
bhandara fort issueImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 05, 2023 | 7:41 AM
Share

तेजस मोहतुरे, भंडारा : गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्याचा दावा शासनाकडून (Maharashtra government) केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी दिसत आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागड (ambagad)येथे सातपुडा पर्वतरांगातील डोंगरावर गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी किल्ल्याची निर्मिती केली होती. इतिहासाची साक्ष देत असलेला या किल्ल्याच्या वापर महत्त्वाचे राजकीय कैदी ठेवण्यासाठी करण्यात आला होता. परंतु सध्या किल्ल्याची स्थिती बघता हा किल्ला स्वतः शिक्षा भोगत असल्याचे दिसून येत आहे.

या किल्ल्यात महत्त्वाचे राजकीयकैदी ठेवले जात असत

तुमसरपासून 15 किलोमीटर, जिल्हा मुख्यालयापासून 45 किलोमीटर व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर आंबागड किल्ला आहे. या किल्ल्याची स्थापना 1690 मध्ये गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी केली होती. या किल्ल्याची जमिनीपासून उंची 1500 (460 मी) फूट इतकी आहे. या किल्ल्याच्या विस्तार दहा एकरात असून हा किल्ला डोंगरावर आहे. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील टेकड्यात हा किल्ला आहे. गोंड सत्तेच्या अस्तानंतर आंबागड किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर शेवटी इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला. या किल्ल्याची संरक्षण रचना बघता या परिसरातील हा एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जात होता. या किल्ल्यात महत्त्वाचे राजकीयकैदी ठेवले जात असत, अशी या इतिहासात नोंद आहे.

किल्ल्याला ठीक ठिकाणी भेगा पडल्या असून…

दरम्यान इतिहासात नोंद असलेल्या सद्धा प्रशासकिय दुर्लक्षतेमुळे हयगय होत आहे. किल्ल्याला ठीक ठिकाणी भेगा पडल्या असून पुरातत्व विभाग ही लक्ष द्यायला तयार नाही. आंबागड किल्ल्याला असलेला भुयारी मार्ग रामटेक येथे निघत असल्याचे सांगितले जात होते. परंतु त्याचे येथे अस्तित्व सद्धा दिसत नाही. वेळीच यांची काळजी न घेतल्यास हा किल्ल्या इतिहास जमा होईल असे येणारे पर्यटक सांगत आहे. दरम्यान या किल्लाचे पुनर्वसन करावे अशी मागणी ही पर्यटक करीत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.