AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एका वाघाचा बळी; गोंदिया पाठोपाठ भंडाऱ्यात गेला टायगर

चार दिवसांपूर्वी गोंदिया-कोहमारा रोडवर एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. कारच्या धडकेत हा मृत्यू झाला. आता तुमसर वनपरिक्षेत्रात पुन्हा वाघ मृतावस्थेत सापडला.

आणखी एका वाघाचा बळी; गोंदिया पाठोपाठ भंडाऱ्यात गेला टायगर
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 16, 2023 | 5:22 PM
Share

तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नागझिरा-नवेगावबांध अभयारण्य आहे. या अभयारण्यात वाघांची संख्या वाढावी, असा वनविभागाचा प्लॅन आहे. त्यासाठी महिनाभरापूर्वी ब्रम्हपुरीच्या जंगलातून नागझिऱ्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या. वाघांची संख्या वाढून वन्यजीव सृष्टी योग्य पद्धतीने राहावी, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. पण, हा प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहे. कारण चार दिवसांपूर्वी गोंदिया-कोहमारा रोडवर एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. कारच्या धडकेत हा मृत्यू झाला. आता तुमसर वनपरिक्षेत्रात पुन्हा वाघ मृतावस्थेत सापडला. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण कसे करायचे असा प्रश्न वनविभागापुढे पडला आहे.

शेतात पानांनी झाकून ठेवला वाघाचा मृतदेह

भंडारा जिल्ह्यातील खंदाळ येथील शेतात एक पट्टेदार वाघ पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आढळला. रतन वाघमारे यांच्या शेतात हा वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. शेतात पाहणी केली असता, शेतातील एका भागात झाडांच्या पानांनी हा वाघ झाकून ठेवला होता.

वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे?

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यानी भात पिकाची लागवड केली. त्यानंतर किडींचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून औषध फवारणी केली होती. कदाचित शेतातून जाताना वाघानं रासायनिक औषधयुक्त पाणी पिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असावा. किंवा वीज प्रवाहाचा करंट लागून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

रासायनिक पदार्थांचा वापर वाढला

मात्र, मृत वाघाचं शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण पुढे येईल. सध्या वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, तपास सुरू आहे. रासायनिक पदार्थांचा वापर वाढल्याने अन्नधान्य दूषित होत आहे. हे विषयुक्त अन्न खाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होत आहे. परंतु, याचे ज्ञान शेतकऱ्यांना नसल्याने ते रासायनिक पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे.

फेन्सिंगचं काय?

वनविभाग वन्यप्राणी आणि जंगलावर करोडो रुपये खर्च करते. वन्यजीवांची संख्या वाढल्याने प्राणी गावात येतात. शेतातील पिकांचे नुकसान करतात. शेवटी शेतकरी शेतात करंट लावतात. यामुळे काही वन्यप्राणी मृत्यूमुखी पडतात. वन्यप्राणी जंगलातून शेतात येऊ नये, यासाठी फेन्सिंगची गरज आहे. पण, याकडे वनविभाग केव्हा लक्ष देणार हे समजण्यापलीकडे आहे.

Follow Us
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची...
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची राजकारणात चर्चा!