AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन बच्चू कडू यांनी ओबीसी नेत्यांचे टोचले कान

बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन ओबीसी समाजाच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. बच्चू कडू यांनी आज मनोज जरांगे यांच्या सभेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांबाबत मोठं वक्तव्य केलं.

Bachchu Kadu | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन बच्चू कडू यांनी ओबीसी नेत्यांचे टोचले कान
bachchu kadu
| Updated on: Oct 14, 2023 | 10:18 PM
Share

भंडारा | 14 ऑक्टोबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी गावात मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्य सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यांच्या या अल्टिमेटम आणि भाषणावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हाथ आहे, असं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी उत्तर दिलं. सदावर्ते संशोधक, तज्ज्ञ आहेत. त्यांनी कोणत्या कॅमेरातून शरद पवार यांचे हाथ, पाय पाहिले ते सांगावं, अशी मिश्किल टीका बच्चू कडू यांनी केली.

मनोज जरंगे यांनी येवढ्या टोकाच्या भूमिकेत जाऊ नये. सरकार मराठ्याला आरक्षण देणार. यात काही शंका नाही आहे. “मनोज जरंगे यांनी येवढ्या टोकाच्या भूमिकेत जाऊ नये. सरकार मराठ्याला आरक्षण देणार. यात काही शंका नाही आहे. मराठा आरक्षणा संदर्भात शासन धोरण सुद्धा झालेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. कोर्टात निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला तर एका दिवसात मराठा आरक्षण मिळेल”, असं बच्चू कडू म्हणाले.

मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्यावे, अशी विनंती केलीय. पण त्यांच्या या भूमिकेवर ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे. ओबीसी समाजाकडून राज्यभरात या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावरदेखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी वाल्यांनी जो काही आड आणण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे असं मला वाटतं, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

“देशामध्ये हजार जाती आहे. हजार जातींमध्ये दोन वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ते म्हणजे एक शेतकरी आणि दुसरा मजूर. 75 टक्के शेतकरी सर्व जातीत भेटतात अणि मजूर सुद्धा भेटतात. आरक्षण मागण्याची वेळ का आली? तर शेतीमालाला भाव नाही. शेती मालाला भाव मिळाला असता तर नोकरी कोणी मागितली नसती. सर्व सरकार हे फेल ठरले. अपयशी ठरले. शेती मालाला भाऊ देऊ शकले नाहीत. त्यांच्यामुळे आरक्षणाचे मुद्दे समोर येत आहेत”, असं बच्चू कडू म्हणाले.

“जाती जमातीमध्ये आरक्षणाशिवाय पर्याय नाही. नोकरी शिवाय दुसरी रोजगाराची संधी वाटत नाही. गेल्या 75 वर्षात सर्व सरकारने अपयश मिळवलं, जे शेतकऱ्यांच्या माथी मारलं. ओबीसीमध्ये माझ्या वडिलांच्या टीसीवर मराठा होतं. महसुली दप्तरी कुणबी आहे आणि मी मराठा सुद्धा आहे. मला कुणबी प्रमाणपत्र मिळालं कारण पंजाबराव देशमुख यांनी प्रचार केला की, मराठा वाल्यांनी कुणबी लिहा. माझ्या कुटुंबियांनी कुणबी लिहिलं म्हणून मी कुणबी झालो”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

“जे मराठे आहेत ते कुणबी, म्हणजे शेती करणारा हा कुणबी. मराठा हे एका जातीचे नाव नाही. तर या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला मराठा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धात औरंगजेबाचे वाक्य पाहिले तर तो म्हणायच्या कहा गये मराठे. 18 पगळ जातीमधले लोक म्हणजे मराठे होते. ती पदवी होती. जसे देशमुख आहेत, राजपूत , पाटील पदवी आहे तशीच मराठा ही पदवी होती. यात ओबीसी वाल्यांनी जे काही आड आणण्याचा प्रयत्न केला ते चुकीचा आहे असं मला वाटतं”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.