AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला, संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले, रुग्णालयात गर्दी

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. अचानक झालेल्या बदलामुळे वातावरण बदलून गेलं आहे.

वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला, संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले, रुग्णालयात गर्दी
BHANDARAImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 10, 2023 | 7:55 AM
Share

भंडारा : वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात (Rural Area) पहायला मिळत असून सर्दी, खोकला, डोकेदुखी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने भंडारा (bhandara) जिल्हातील ग्रामीण भागातील रुग्णालय फुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी (Doctor) दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाचं बदल झाला आहे. अचानक वातावरणात तापमान वाढल्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे.

वेळीच सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले

भंडारा जिल्ह्यात सद्धा उन्हं पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरु आहे. अचानक होत असलेल्या वातावरणीय बदलामुळे विषाणुजन्य रोगांची वाढ होत आहे. काहीवेळा सर्दी, खोकला, फ्लू विषाणूजन्य नसून जीवाणूंमुळे होतात. अशा वेळेस ताप येणे, कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके घ्यावी लागतात. त्याचसोबत वेळीच निदान, औषधे, वाफ आदी उपचार आजाराच्या सुरुवातीलाच केले. नंतरची गुंतागुंत टाळता येते. मागील तीन-चार अचानक वातावरणात बदल झाल्याने दमट तर कधी थंड वातावरणाचा बदलामुळे रुग्णाची संख्या वाढत असल्याचे चित्र डॉक्टर सांगत आहेत. त्यामुळे वेळीच सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

वातावरणात मोठा बदल झाला आहे.

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. अचानक झालेल्या बदलामुळे वातावरण बदलून गेलं आहे. त्याचा फटका लोकांना बदला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात सु्द्धा संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर शक्य असल्यास मास्क वापरावे असं जाहीर करण्यात आलं आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....