AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला, संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले, रुग्णालयात गर्दी

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. अचानक झालेल्या बदलामुळे वातावरण बदलून गेलं आहे.

वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला, संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले, रुग्णालयात गर्दी
BHANDARAImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 10, 2023 | 7:55 AM
Share

भंडारा : वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात (Rural Area) पहायला मिळत असून सर्दी, खोकला, डोकेदुखी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने भंडारा (bhandara) जिल्हातील ग्रामीण भागातील रुग्णालय फुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी (Doctor) दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाचं बदल झाला आहे. अचानक वातावरणात तापमान वाढल्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे.

वेळीच सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले

भंडारा जिल्ह्यात सद्धा उन्हं पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरु आहे. अचानक होत असलेल्या वातावरणीय बदलामुळे विषाणुजन्य रोगांची वाढ होत आहे. काहीवेळा सर्दी, खोकला, फ्लू विषाणूजन्य नसून जीवाणूंमुळे होतात. अशा वेळेस ताप येणे, कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके घ्यावी लागतात. त्याचसोबत वेळीच निदान, औषधे, वाफ आदी उपचार आजाराच्या सुरुवातीलाच केले. नंतरची गुंतागुंत टाळता येते. मागील तीन-चार अचानक वातावरणात बदल झाल्याने दमट तर कधी थंड वातावरणाचा बदलामुळे रुग्णाची संख्या वाढत असल्याचे चित्र डॉक्टर सांगत आहेत. त्यामुळे वेळीच सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

वातावरणात मोठा बदल झाला आहे.

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. अचानक झालेल्या बदलामुळे वातावरण बदलून गेलं आहे. त्याचा फटका लोकांना बदला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात सु्द्धा संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर शक्य असल्यास मास्क वापरावे असं जाहीर करण्यात आलं आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक