AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Bandh today : ‘7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा’

सोशल मीडियावर अशी घोषवाक्य शेअर करून बंदमध्ये सामील होण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे.

Bharat Bandh today : '7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा'
| Edited By: | Updated on: Dec 08, 2020 | 8:27 AM
Share

सोलापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची (Bharat Bandh today) हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रातूनही (Maharashtra) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. राजकीय पक्षांसह सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी कडकडीत बंद पाळत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी सोलापूरमध्ये या बंदसाठी काही भन्नाट घोषवाक्य वापरण्यात आली आहेत. (Bharat Bandh today amid farmer protests maharashtra update mumbai pune news)

भारत बंदमध्ये सामील होण्यासाठी समाज माध्यमांमध्ये भन्नाट घोषवाक्य व्हायरल झाली आहेत. ‘7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा’ हे घोषवाक्य आज बंदच्या निमित्ताने व्हायरल होताना दिसत आहे. इतकंच नाही तर ‘वावर हाय तर पावर हाय’ अशाही घोषणा आंदोलक देत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अशी घोषवाक्य शेअर करून बंदमध्ये सामील होण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. आज संपूर्ण देशभरात कडकडीत बंद पुकारण्यात आला. शेतकरी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण नेमक्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत? कोणते कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. आपण समजून घेऊयात नेमका सरकारने पारित केलेला कृषी कायदा काय आहे?, शेतकऱ्यांचा या कृषी कायद्याला विरोध का आहे?

कोणते कृषी कायदे वादग्रस्त?

1) कृषी उत्पादने, व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 2) हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020 3) जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020

शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?

1) तिन्ही कृषी कायदे मागे घ्या 2) हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा 3) किमान हमी भावाचा कायदा करा 4) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा 5) सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा 6) कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा 7) राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा

शेतकऱ्यांना कशाची चिंता?

1) हमी भाव राहील असे सरकार तोंडी म्हणतंय, त्याची खात्री नाही 2) सरकार हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंद करेल 3) खाजगी कंपन्या हमी भावाने शेतमाल घेतील याची खात्री नाही 4) कृषी कायद्यांमुळे खाजगी कंपन्यांची खरेदी दरात मनमानी होईल 5) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी यंदापासून राज्यांना बंद 6) शक्तीशाली कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करतील, फसवतील (Bharat Bandh today slogan viral on social media for bharat bandh and farmers protest maharashtra news)

इतर बातम्या – 

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

(Bharat Bandh today slogan viral on social media for bharat bandh and farmers protest maharashtra news)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...