AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात संघर्ष पेटणार? भर मेळाव्यात भास्कर जाधव यांची योगेश कदम यांच्याविरोधात मोठी घोषणा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, भर मेळाव्यात त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

कोकणात संघर्ष पेटणार? भर मेळाव्यात भास्कर जाधव यांची योगेश कदम यांच्याविरोधात मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2025 | 8:44 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री योगेश कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आमने -सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते, त्याला प्रत्युत्तर देताना कदम यांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मेळाव्यात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

नेमकं काय म्हणाले जाधव?  

योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांनी भर मेळाव्यात उमेदवारच जाहीर केला आहे. यावेळी बोलताना जाधव यांनी म्हटलं की,  जेव्हढा निधी आमदार म्हणून दापोली विधानसभा मतदार संघात आणतो, त्यापेक्षा जास्त निधी यापुढे गुहागर मतदार संघात देऊ, आमदार व्हायचं आहे तर दापोली मतदार संघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असं समजा असं यावेळी भास्कर जाधव यांनी सहदेव बेटकर यांना उद्देशून म्हटलं आहे.  सहदेव बेटकर हे 2019 मध्ये भास्कर जाधवांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते, मात्र आता जाधव यांनी त्यांना थेट योगेश कदम यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी रामदास कदम यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी डान्सबारवरून कदम यांच्यावर आरोप केले होते, तोच धागा पकडत जाधव यांनी पुन्हा कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी कदम यांची नक्कल देखील केली. त्यामुळे आता कदम हे भास्कर जाधव यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान यापूर्वी परब यांनी देखील कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना त्यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी देखील हल्लाबोल केला आहे, त्यामुळे कोकणात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?