AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभव बिहारमध्ये, पण भूकंप महाराष्ट्रात, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

बिहारामध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएनं बाजी मारली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप सर्वात मोठा पक्षत ठरताना दिसत आहे, तर काँग्रेस अवघ्या दोन जागेवर आघाडीवर आहे.

पराभव बिहारमध्ये, पण भूकंप महाराष्ट्रात, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
काँग्रेस Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 4:18 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. बिहारमध्ये महाआघाडीचा मोठा पराभव झाला असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 96 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर जेडीयूला देखील मोठं यश मिळालं आहे, जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान काँग्रेस अवघ्या दोन जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे, बिहारमधील पराभवानंतर आता मोठी बातमी समोर आली असून, काँग्रेसला महाराष्ट्रात देखील मोठा झटका बसला आहे. बड्या नेत्यानं काँग्रेसची साथ सडोली आहे.

बिहारच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे,  ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी तडकाफडकी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.  दयानंद चोरगे हे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भिवंडीतील उमेदवार होते. माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं दयानंद चोरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र त्यांनी पत्रात जरी असं म्हटलं असलं तर देखील ते गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक निवडणुकांमध्ये डावलं गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे.  बिहारचा निकाल हाती येताच दयानंद चोरगे यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोडांवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे, त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये.  महाआघाडी अवघ्या 29 जागांवर आघाडीवर आहे, महाआघाडीमध्ये आरजेडी हा मोठा पक्ष ठरला असून, आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार आरजेडी 25 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस अवघ्या 2 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसमुळेच आरजेडीला फटका बसला, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेडयूपेक्षा यावेळी भाजपच्या जागा अधिक असल्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री आता कोण होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे