AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय; विजय वडेट्टीवारांनी थेटच सांगितलं

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला. आता मोठी अपडेट समोर आली आहे.

सर्वात मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा... काँग्रेसचा मोठा निर्णय; विजय वडेट्टीवारांनी थेटच सांगितलं
Sunetra PawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 09, 2026 | 12:08 PM
Share

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. शरद पवारांपासून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेसला बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने दोन्ही राष्ट्रवादीचे नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रयत्नानंतर अखेर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तसं सुतोवाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“या निर्णायापूर्वी दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करुन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉ करण्याची प्रक्रिया सुरु होईल. आमची भावना म्हणण्यापेक्षा विशेष करुन मला तर नाही पण प्रदेश अध्यक्षांना अनेकांचे फोन आलेत. सत्ताधारी पक्षातील म्हणा किंवा उपमुख्यमंत्री जे आता निवडणुक लढत आहेत सुनेत्रा पवार आणि त्यांचाही फोन होता. एकूण तिथली परिस्थती पाहता एकूण, सगळ्या लोकांची भावना लक्षात घेता, तिकडे निवडणुकीमधून पुढे जाणं हे थांबावं अशा प्रकारची भूमिका दिसली. आमच्या सर्वांचे एकमत झालेलं आहे”, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा दिल्लीतुन हर्षवर्धन सपकाळांशी संवाद

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत संवाद साधत आहेत. रमेश चेन्निथला हर्षवर्धन सपकाळ आणि दिल्लीतील नेत्यांची चर्चा सुरू आहे. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेण्याच्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. माघारीची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली असली तरी, कॉग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाही. बारामती पोटनिवडणूकीची उमेदवारी मागे घेण्याबाबत कॉग्रेसमध्येच असमन्वय आहे. कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय येण्याआधीच विजय वडेट्टीवारांनी परस्पर बारामती पोट निवडणूकीतून माघारीची घोषणा केली. सध्या मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉग्रेसचे वरिष्ठ नेते यांची चर्चा सुरु आहे.

Follow Us
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली