AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट; नवीन एसआयटीची स्थापना, कारण काय?

मोठी बातमी समोर येत आहे, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता नव्या एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट; नवीन एसआयटीची स्थापना, कारण काय?
संतोष देशमुख
| Updated on: Jan 13, 2025 | 8:43 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, सोबतच न्यायालयीन चौकशी सुरू असून, एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणात पुन्हा एकदा नव्यान एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. नव्या एसआयटीमध्ये  अनिल गुजर. विजयसिंग जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ,चंद्रकांत एस काळकुटे, बाळासाहेब देविदास अहंकारे, संतोष भगवानराव गित्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून बसवराज तेली हेच कायम राहणार आहेत.

नेमकं कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जी एसआयटी नेमण्यात आली होती, त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता. यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत, असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबाने केला होता. त्यानंतर आता एसआयटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवराज तेली हेच नव्या एसआयटीचे अध्यक्ष राहणार आहेत, मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक 

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे, मात्र या प्रकरणात आरोप होऊन देखील वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का न लावण्यात आल्यानं आज मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले, पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी आंदोलन केलं.  या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. या आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील सहभागी झाले होते, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली, वाल्मिक कराडवर मोक्का का लावला जात नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.