AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

542 पैकी जे 10 जागा लढवतात, त्यांच्या आश्वासनांवर कोणाचा विश्वास बसेल ? पवारांच्या शपथनाम्यावर फडणवीसांचा टोला

पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज भरत असून त्यापूर्वी त्यांची प्रचार रॅली झाली. मोठं शक्तीप्रदर्शत करण्यात आलं. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा त्यांनी हे विधान करत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीतील विजयासंदर्भातही विश्वास व्यक्त केला.

542 पैकी जे 10 जागा लढवतात, त्यांच्या आश्वासनांवर कोणाचा विश्वास बसेल ? पवारांच्या शपथनाम्यावर फडणवीसांचा टोला
अर्ज भरण्यापूर्वी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचं शक्तीप्रदर्शन
| Updated on: Apr 25, 2024 | 1:14 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा आज प्रकाशित झाला. त्यात अनेक मुद्दे मांडले, मोदींनी हे केलं नाही म्हणून आह्ला करावं लागतंय अशी टीका करत राष्ट्रवादीने हा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ 542 खासदारांमध्ये(जागांपैकी) जे 10 जागा लढवत आहेत, ते जाहीरनामा प्रकाशित करतायत. आम्ही यंव करू-त्यंव करू असं म्हणतात, त्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? ‘ असा खोचक सवाल विचारत पडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि पवारांवर पलटवार केला.

पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज भरत असून त्यापूर्वी त्यांची प्रचार रॅली दुपारी पाडली. मोठं शक्तीप्रदर्शत करण्यात आलं.. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा त्यांनी हे विधान करत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीतील विजयासंदर्भातही विश्वास व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात येतो. पुण्यात आज राष्ट्रवादी शरचदंद्र पवार गटाकडून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले. जयंत पाटील यांनी शपथनाम्यातील आश्वासनांची माहिती दिली. त्याआधी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या याच टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

महाराष्ट्रात किती जागा मिळणार ?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता जवळजवळ सुटला आहे. गेल्या वेळेपेक्षा महायुतीली निश्चितच चांगलं यश मिळेल आणि गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र नक्की किती जागा जिंकणार याचा निश्चित आकडा नमूद करणं त्यांनी टाळलं. सगळं आलबेल आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार , मी आणि इतर सर्व घट पक्ष सोबत आहोत, असं सांगत महायुतीमध्ये सर्व आलबेल असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

बारामतीत बाजी कोण मारणार ?

सुप्रिया सुळेंना निवडून देणं म्हणजे राहुल गांधींना निवडून देणं. आणि सुनेत्रा पवारांना निवडून देणं म्हणजे माननीय मोदीजींना विजयी करणं हे बारामतीच्या जनतेला हे माहीत आहे की . बारामतीची जनता मोदीजींच्या पाठिशी आहे, असं सांगत फडणवीस यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच जिंकतील असा विश्वास व्यक्त केला.

Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा