AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प

भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाले लावण्याचा संकल्प केलाय. बोरिवलीमध्ये वृक्षारोपणाच्या एका कार्यक्रमात शेट्टी यांनी ही घोषणा केलीय.

पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प
खासदार गोपाळ शेट्टी यांचा वृक्षारोपणाचा संकल्प
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 5:04 PM
Share

मुंबई : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मुंबईतील अनेक झाडं उन्मळून पडली. अनेक झाडं धोकादायक असल्याचं सांगत तोडण्यात आली. मात्र, त्या तुलनेत नव्याने वृक्ष लागवड होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाले लावण्याचा संकल्प केलाय. बोरिवलीमध्ये वृक्षारोपणाच्या एका कार्यक्रमात शेट्टी यांनी ही घोषणा केलीय. (Gopal Shetty decides to plant 5,000 trees in East Mumbai area)

चक्रीवादळामुळे मुंबईतील झाडं तोडली जात आहेत. जून महिना संपत आला तरी मुंबई महापालिकेकडे अजून झाडं नाहीत. मुंबईच्या महापौरांनी अजून कुठंही झाडं लावली नाहीत. सोबतच आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकानं महापालिकेकडे झाडं नसल्याबाबत आवाज उठवला नाही, अशी खंतही गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलीय. कोरोना संकटाच्या काळात गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या साथीनं 5 हजार बाटल्या रक्त जमा करण्याचा संकल्प केला होता आणि तो त्यांनी पूर्णही केला आहे. आता शेट्टी यांनी पूर्व मुंबईत 5 हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प केलाय.

मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा?

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात मला मंत्रिपद दिले तरी नको, मी खासदार म्हणूनच ठीक आहे, अशी भूमिका मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली आहे. केंद्रात मंत्रिपदासाठी शेट्टी तूर्तास तरी इच्छुक नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलात माझे नाव असल्याची चर्चा मी माध्यमांतून ऐकली. मात्र मला मंत्रिपद नको. मी खासदार म्हणून काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया खासदार गोपाळ शेट्टी यानी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

जुलै महिन्यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात राज्यातून गोपाळ शेट्टी आणि सुरेश प्रभू यांची नावे चर्चेत आहे. मंत्रिपदाला न्याय देऊ शकतील अशी माझ्यापेक्षा चांगली व्यक्तिमत्व भाजपात आहेत. मी खासदार राहूनच जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करु शकतो, असं मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलं.

कोण आहेत गोपाळ शेट्टी?

गोपाळ चिन्नया शेट्टी हे मुंबईतील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. 31 जानेवारी 1954 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. नॉन मॅट्रिक असलेल्या गोपाळ शेट्टी यांनी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी 35 वर्ष साईनाथ इंजिनीयरिंग वर्क्सच्या माध्यमातून टर्नर फिटर वेल्डरचा व्यवसाय केला. मात्र, नंतरच्या काळात जनसंपर्क आणि चांगल्या कामगिरीच्या बळावर ते भाजपमध्ये एकएक पायरी चढत वर गेले.

इतर बातम्या :

राज्य सरकारच्या बेफिकिरीमुळेच स्वप्निल लोणकरची आत्महत्या; प्रवीण दरेकरांची टीका

Video : विकेंड लॉकडाऊनची ऐशीतैशी, कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण

Gopal Shetty decides to plant 5,000 trees in East Mumbai area

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.