AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्यात शेतकरी जागर मंचच्या वतीने रक्त यज्ञ! शंभराहून अधिक शेतकरी पुत्रांचे रक्तदान!

वर्षभर सुरु असलेल्या दिल्लीतील आंदोलनात 759 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. त्या माय-बाप शेतकऱ्याला श्रद्धांजली म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जागर मंचतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अकोल्यात शेतकरी जागर मंचच्या वतीने रक्त यज्ञ! शंभराहून अधिक शेतकरी पुत्रांचे रक्तदान!
अकोल्यात शेतकरी पुत्रांकडून रक्तदान आंदोलन
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 24, 2021 | 6:05 PM
Share

गणेश सोनोने, अकोलाः शेतकरी जागर मंचच्या वतीनं अकोल्यात रक्त यज्ञ आंदोलन करण्यात आलं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात(Farmer agitation) मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना या यज्ञाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केंद्र सरकारनं केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं जे आंदोलन मागील वर्षापासून सुरु आहे. त्यात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना या यज्ञाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. या यज्ञात शेकडो शेतकरी पुत्रांनी सहभाग नोंदवला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर रक्तयज्ञाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी ज्या बांधवांनी बलीदान दिले, त्यांचे या कार्यक्रमात स्मरण करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शेतकरी आंदोलनाची 26 नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती

येत्या 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान नरेंद्र मोदी सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा कागदोपत्री होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असी भूमिका अनेक शेतकरी संघटनांनी घेतली आहे. वर्षभर सुरु असलेल्या या आंदोलनात 759 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. त्या माय-बाप शेतकऱ्याला श्रद्धांजली म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जागर मंचतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

इतर बातम्या-

रेशन दुकानांमध्ये 5 किलो गहू अन् तांदुळ मोफत योजना सुरुच रहाणार- मोदी सरकारचा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणास विरोध का? पवारांनी सरकारची भीती बोलून दाखवली

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..