AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026: उद्धव ठाकरेंना एक चूक महागात पडली… नाही तर आज महापौर असता; काय घडलं असं?

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातून का गेली? कोणती एक चूक उद्धव ठाकरे यांना महागात पडली... असं घडलं तरी काय? निकाल घोषित झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण..

BMC Election 2026:  उद्धव ठाकरेंना एक चूक महागात पडली... नाही तर आज महापौर असता; काय घडलं असं?
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 17, 2026 | 1:01 PM
Share

BMC Election 2026: भाजपचा 25 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप पक्षाने झेंडा फडकवला आहे. महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेने एकत्र लढली आणि मोठा वियज प्राप्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासमोर उद्धव ठाकरे फेल ठरलेत… महायुतीने बीएमसीमध्ये बहूमत मिळवलं आहे. 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी ठरले. एकट्या भाजपने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत. त्यामुळे मुंबईत देखील भाजप मोठा पक्ष ठरला आहे. कारण भाजपने सर्वांत श्रीमंत महानगरपालिकेवर आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे…

उद्धव ठाकरे यांच्या गटाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पक्षासाठी निवडणूक फार वाईट ठरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 65 जागांवर समाधान मानावं लागलं. 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 84 उमेदवार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षानंतर एकत्र आले. पण त्याचा देखील काही फायदा झाला नाही… कारण मनसेचा फक्त सहा जागांवर विजय झाला.

अशाप्रकारे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला फक्त 71 जागांवर विजय मिळवता आला. पण, उद्धव ठाकरे यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर चित्र काही प्रमाणात वेगळं दिसलं असतं. त्यांनी विधानसभा निवडणुकीसारखीच रणनीती अवलंबली असती तर आजचं चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं.

उद्धव ठाकरे यांची एक चूक…

आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणची चूक झाली, ज्यामुळे बीएमसी त्यांच्या हातातून गेली… जर उद्धव ठाकरेंनी ती चूक केली नसती तर मुंबई त्यांच्याकडे राहिली असते. सध्याच्या निकालांकडे पाहता असं दिसतं की केवळ उद्धव ठाकरेंनीच नव्हे तर काँग्रेस पक्षाने देखील चूक केली आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर निकाल काहीसा वेगळा आणि समाधानकारक असता. काँग्रेसने निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि 24 जागांवर विजय मिळवला. जर उद्धव ठाकरे काँग्रेसला पटवून देण्यात आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकत्र करण्यात यशस्वी झाले असते, तर कदाचित बीएमसीमध्ये मतांचे विभाजन कमी झालं असतं आणि जास्त जागा जिंकता आल्या असत्या.

पराभवाचा परिणाम काय होईल?

बीएमसी उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली… हा फार मोठा धक्का आहे. कारण मुंबई महानगरपालिका शिवसेनेची खरी ताकद आहे… गेल्या 25 वर्षांपासून एकट्या ठाकरे कुटुंबियांचे मुंबईवर वर्चस्व होतं. अशात निकाल समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्णय घेत पाऊल ठेवायला हवीत… उद्धव ठाकरे आता काँग्रेससोबत चर्चा करतील की मनसेसोबत राहतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?