AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026: मुंबई हरल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने 118 जागा जिंकल्या. तर मनसे पक्षाचे फक्त 6 उमेदवार जिंकले... निकाल घोषित झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला आहे...

BMC Election 2026: मुंबई हरल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला
राज ठाकरे
| Updated on: Jan 17, 2026 | 11:23 AM
Share

BMC Election 2026: महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजप बहूमतांनी जिंकून आला आहे. आता मुंबईत देखील भाजपने बहुमत मिळवलं आहे. बीएमसी निवडणुकीत सत्ता संतुलन पूर्णपणे भाजप-एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने होतं. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने 118 जागा जिंकल्या. भाजपने 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने 29 जागा जिंकल्या. तर मनसे पक्षाचे फक्त 6 उमेदवार जिंकले आहेत. मुंबई हरल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला आहे.

निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक गोष्ट सर्वत्र ट्रेन्ड करत आहे आणि ती गोष्ट म्हणजे ‘रसमलाई…’, यामागे कारण देखील तसं आहे. सांगायचं झालं तर, निवडणुकींच्या प्रचारा दरम्यान, तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष अन्नामलाई मुंबईत दाखल झाले. तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रसमलईच्या व्यंगाने त्यांचे स्वागत केलं. आता निकाल समोर आले आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक ठिकाणी खातं देखील खोलता आलं नाही. तर ज्याठिकाणी अन्नामलाई यांनी प्रचार केला, तेथील उमेदवार निवडून आले आहेत.

निवडणुकीचे निकाल येताच, परिस्थिती बदलली. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली, तर अन्नामलाई यांनी ज्या भागात सभा घेतल्या त्या भागात भाजपने दणदणीत विजय मिळवला. आता भाजप ओडिशाचे नेते पीसी मोहन यांनी इंस्टाग्रामवर रसमलईचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “काही रसमलई ऑर्डर केली.”

काय आहे रसमलाई प्रकरण?

रसमलाई वादाची सुरुवार निवडणूक प्रचारा दरम्यान झाली. तामिळनाडू भाजपचे ज्येष्ठ नेते के. अन्नामलाई प्रचारासाठी मुंबईला आले तेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. अन्नामलाई यांच्या नावाची खिल्ली उडवत एका सभेत राज ठाकरे म्हणालेले, ‘भाजप आता रसमलाई बोलत आहे…’, राज ठाकरे यांना असं म्हणायचं होतं की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत दक्षिण भारतातील नेत्याचं काय काम?

सांगायचं झालं तर, निकालानंतर सोशल मीडियावर रसमलाई ट्रेन्ड करत आहे. #Rasmalai आणि #Annamalai हे दोन हॅशटॅग व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...