AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026: मुंबई हरल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने 118 जागा जिंकल्या. तर मनसे पक्षाचे फक्त 6 उमेदवार जिंकले... निकाल घोषित झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला आहे...

BMC Election 2026: मुंबई हरल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला
राज ठाकरे
| Updated on: Jan 17, 2026 | 11:23 AM
Share

BMC Election 2026: महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजप बहूमतांनी जिंकून आला आहे. आता मुंबईत देखील भाजपने बहुमत मिळवलं आहे. बीएमसी निवडणुकीत सत्ता संतुलन पूर्णपणे भाजप-एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने होतं. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने 118 जागा जिंकल्या. भाजपने 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने 29 जागा जिंकल्या. तर मनसे पक्षाचे फक्त 6 उमेदवार जिंकले आहेत. मुंबई हरल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला आहे.

निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक गोष्ट सर्वत्र ट्रेन्ड करत आहे आणि ती गोष्ट म्हणजे ‘रसमलाई…’, यामागे कारण देखील तसं आहे. सांगायचं झालं तर, निवडणुकींच्या प्रचारा दरम्यान, तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष अन्नामलाई मुंबईत दाखल झाले. तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रसमलईच्या व्यंगाने त्यांचे स्वागत केलं. आता निकाल समोर आले आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक ठिकाणी खातं देखील खोलता आलं नाही. तर ज्याठिकाणी अन्नामलाई यांनी प्रचार केला, तेथील उमेदवार निवडून आले आहेत.

निवडणुकीचे निकाल येताच, परिस्थिती बदलली. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली, तर अन्नामलाई यांनी ज्या भागात सभा घेतल्या त्या भागात भाजपने दणदणीत विजय मिळवला. आता भाजप ओडिशाचे नेते पीसी मोहन यांनी इंस्टाग्रामवर रसमलईचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “काही रसमलई ऑर्डर केली.”

काय आहे रसमलाई प्रकरण?

रसमलाई वादाची सुरुवार निवडणूक प्रचारा दरम्यान झाली. तामिळनाडू भाजपचे ज्येष्ठ नेते के. अन्नामलाई प्रचारासाठी मुंबईला आले तेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. अन्नामलाई यांच्या नावाची खिल्ली उडवत एका सभेत राज ठाकरे म्हणालेले, ‘भाजप आता रसमलाई बोलत आहे…’, राज ठाकरे यांना असं म्हणायचं होतं की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत दक्षिण भारतातील नेत्याचं काय काम?

सांगायचं झालं तर, निकालानंतर सोशल मीडियावर रसमलाई ट्रेन्ड करत आहे. #Rasmalai आणि #Annamalai हे दोन हॅशटॅग व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत