AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, दोन खलाशी बेपत्ता

Ratnagiri रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर एकूण पाच जण हेते. त्यापैकी तिंघाना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहे.

Ratnagiri : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, दोन खलाशी बेपत्ता
| Updated on: Aug 21, 2022 | 11:31 AM
Share

रत्नागिरी : रत्नागिरीच्या (Ratnagiri) भाट्ये समुद्रात बोट (boat) बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर एकूण पाच जण हेते. त्यापैकी तिंघाना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दोघांचा शोध सुरू असून, ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीवर हे पाच जण मासेमारी करण्यासाठी निघाले होते. मासेमारीसाठी समुद्रात गेले. मात्र त्यानंतर अचानक ही बोट बुडाली. दरम्यान या पाच पैकी तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्यापही यातील दोन जण बेपत्ता आहे. बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही बोट समुद्रात कशी बुडाली याबाबत माहिती समोर आलेली नाही . रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) राबवत तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाच जण मासेमारीसाठी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात उतरले होते. एका छोट्या बोटीच्या मदतीने मासेमारी सुरू होती. मासेमारी सुरू असतानाच अचानक ही बोट बुडाली.  घटना लक्षात आल्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. या बोटीमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर अद्यापही दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी त्यांचा काहीही ठावठिकाणा लागू  शकलेला नाही. ही बोट नेमकी कशी  बुडाली याची देखील माहिती समोर आलेली नाहीये. सध्या बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरु आहे.

पावसाळ्यात समुद्र बनतात धोकादायक

दरम्यान पावसाळ्यात समुद्र धोकादायक बनतात. वादळाची शक्यता असते. वादळामुळे अजस्त्र लाटा उसळतात. सध्या बंगाच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर वादळात झालेले आहे. याच पार्श्वभूमीर राज्यात शनिवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. नदी काठच्या गावांना तसेच खोल समुद्रात मासेमरी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.