AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले पण,…

समृध्दी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले होते. परंतु, अजूनही स्पॉटचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले पण,...
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jul 01, 2023 | 4:01 PM
Share

यवतमाळ : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात यवतमाळ येथील यात जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची महिती समोर येत आहे. आमदार मदन येरावार पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात आहे. लिस्टमध्ये केवळ नाव असल्याने मृतांची ओळख पटवणे कठीण जात आहे. त्यामुळे नातेवाईक हे बुलढाणाकडे रवाना झाले आहे. समृध्दी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले होते. परंतु, अजूनही स्पॉटचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आमदार मदन येरावार यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत

बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करावी. या अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने 5 लाखांची सांत्वनपर मदत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 लाखांची सांत्वनपर मदत जाहीर केली आहे. अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

पुन्हा अपघात होऊ नये यासाठी काळजी घेणार

हा अपघात भयंकर आणि दुःखदायक होता. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्युचा सापळा ठरू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र सर्व यंत्रणा आणि वाहनचालकांनीसुद्धा सावधानी ठेऊन पुन्हा असे अपघात होऊ नये. याची खबरदारी घ्यावी, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील अपघातग्रस्त खाजगी बस ही नागपूरवरून पुण्यासाठी निघाली. त्यानंतर अपघाताच्या काही तास अगोदर रात्री 10 वाजताच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील न्यू राधाकृष्ण हॉटेल येथे जेवण करण्यासाठी थांबली होती. येथे काही प्रवाशांनी जेवण केलं होतं. तर कारंजा येथून दोन प्रवासी विना बुकिंग या ट्रॅव्हल्समध्ये पुण्याला जाण्यासाठी बसले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील मनीषा विजय बहाले आणि संजय गोविंदराव बहाळे असे प्रवाशांचे नाव असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Follow Us
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!