AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले पण,…

समृध्दी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले होते. परंतु, अजूनही स्पॉटचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले पण,...
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jul 01, 2023 | 4:01 PM
Share

यवतमाळ : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात यवतमाळ येथील यात जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची महिती समोर येत आहे. आमदार मदन येरावार पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात आहे. लिस्टमध्ये केवळ नाव असल्याने मृतांची ओळख पटवणे कठीण जात आहे. त्यामुळे नातेवाईक हे बुलढाणाकडे रवाना झाले आहे. समृध्दी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले होते. परंतु, अजूनही स्पॉटचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आमदार मदन येरावार यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत

बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करावी. या अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने 5 लाखांची सांत्वनपर मदत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 लाखांची सांत्वनपर मदत जाहीर केली आहे. अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

पुन्हा अपघात होऊ नये यासाठी काळजी घेणार

हा अपघात भयंकर आणि दुःखदायक होता. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्युचा सापळा ठरू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र सर्व यंत्रणा आणि वाहनचालकांनीसुद्धा सावधानी ठेऊन पुन्हा असे अपघात होऊ नये. याची खबरदारी घ्यावी, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील अपघातग्रस्त खाजगी बस ही नागपूरवरून पुण्यासाठी निघाली. त्यानंतर अपघाताच्या काही तास अगोदर रात्री 10 वाजताच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील न्यू राधाकृष्ण हॉटेल येथे जेवण करण्यासाठी थांबली होती. येथे काही प्रवाशांनी जेवण केलं होतं. तर कारंजा येथून दोन प्रवासी विना बुकिंग या ट्रॅव्हल्समध्ये पुण्याला जाण्यासाठी बसले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील मनीषा विजय बहाले आणि संजय गोविंदराव बहाळे असे प्रवाशांचे नाव असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.