AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जे ईव्हीएम वर शंका घेत होते त्या शंका घेणे आता बंद”; शिवसेनेच्या खासदाराने विरोधकांवर तोफ डागली

माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अंधश्रध्देच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या निकालादिवशी ते होम हवन करत होते असा टोला त्यांनी खैरे यांना लगावला आहे.

जे ईव्हीएम वर शंका घेत होते त्या शंका घेणे आता बंद; शिवसेनेच्या खासदाराने विरोधकांवर तोफ डागली
| Updated on: May 13, 2023 | 9:36 PM
Share

बुलढाणा : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या विजयाची मोहोर उमटविल्यानंतर आता भाजपवर विरधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तर भाजपने आपला पराभव मान्य करत मतदारांनी जो कौल दिला आहे, त्याचा आम्ही स्वीकार करतो असं मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडून मात्र विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात आता हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेपोटी आपली तत्वं बाजूला ठेऊन सर्व विरोधक एकजूट होत आहेत मात्र त्याचा काहीच परिणाम होणार नाही असा विश्वासही प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

नितिश कुमार, उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावरून आता राजकीय चर्चेना उधान आले आहे. त्यावरूनच आता खासदार प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, भाजपचा विजय झाल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षांकडून ईव्हीएमवर शंका घेत होते.

ते मात्र आता कर्नाटकातील विजयानंतर त्यांनी आता शंका घेणे आता बंद केले असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेसने बाजी मारली असली तरी या निकालाचा राज्यात काही परिणाम होणार नाही असा विश्वासही त्यांनिी यावेळी व्यक्त केला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाला नेमकी कोणती कारणे आहे, मात्र हा जनतेचा कौल आहे आणि तो आम्ही मान्य केला पाहिजे असंही प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला असला तरी त्याचा ठाकरे गटाला काहीही फायदा होणार नाही.

त्या गटाला काहीही मिळालं नाही, आणि मिळणार नाही असा टोलाही प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

दुसऱ्याच्या घरात मुलगा झाल्यानंतर साखर पान वाटण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तर माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अंधश्रध्देच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या निकालादिवशी ते होम हवन करत होते असा टोला त्यांनी खैरे यांना लगावला आहे.

तर त्याच वेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना हा लबाड माणूस असल्याची टीका त्यांनी केली आहे. कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसतात, त्यामुळे तीन महिन्यात सरकार पडणार या संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर खासदार जाधव यांनी टीका केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.