नंदुरबारमध्ये बसमधील प्रवाशाचा heart attack ने मृत्यू; रुग्णालयाकडे गाडी वळवली पण…

हृदयविकार टाळण्यासाठी पोषक आहार घ्यावा. वजनावर नियंत्रण ठेवावे. नियमित स्वरुपात व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. किमान प्रतिदिन 30 मिनिटे, आठवड्याला 5 दिवस किंवा 150 मिनिटांचा व्यायाम आवश्यक ठरतो. वर्षातून एकदा हृद्याची तपासणी करावी.

नंदुरबारमध्ये बसमधील प्रवाशाचा heart attack ने मृत्यू; रुग्णालयाकडे गाडी वळवली पण...
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 12:29 PM

नंदुरबारः नंदुरबारमध्ये (Nandurbar) बसमधील (passenger) प्रवाशाचा हृदयविकाराने (heart attack) मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सुरत-जामनेर बसमधून रोहिदास पाटील हे प्रवास करत होते. ते महापालिकेच्या अग्निशमन दलात फायरमन असल्याचे त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून समजले. पाटील यांना नवापूर-विसरवाडी दरम्यान अचानक त्रास सुरू झाला. त्यांच्या शेजारच्या प्रवाशांनी त्यांची अस्वस्थता पाहिली. त्यांनी चालक आणि वाहकाला सांगितले. वाहकाने लागलीच बस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाकडे वळवली. रुग्णालयात पोहचेपर्यंत पाटील यांना चक्कर आली होती. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील चोपडे येथील नातेवाईकांकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चालक आणि वाहकांनी प्रसंगावधानता दाखवूनही त्यांना ते वाचवू शकले नाहीत. याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

हृदयविकाराची लक्षणे कोणती?

महिला असो किंवा पुरुष दोघांसाठी हृदयविकाराच्या झटक्याचे प्राथमिक लक्षण डोकेदुखी किंवा अस्वस्थता ठरते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी थकवा देखील जाणवतो. सामान्य शारीरिक क्रिया किंवा हालचाली जिथे अधिक परिश्रमाची आवश्यकता नसते. मात्र, त्यावेळी थकव्याची भावना निर्माण होते. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर थरथरते तसेच श्वसनास अडथळा यांसारखी लक्षणे जाणवतात. मात्र, सरळ स्थितीत बसल्यास अशा लक्षणांचे प्रमाण कमी जाणवते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस महिलांना झोपेची तीव्र समस्या जाणवते. तसेच महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पोटदुखी किंवा पोटांत तीव्र दाब जाणवतो.

हृदयविकार कसा टाळता येईल?

हृदयविकार टाळण्यासाठी पोषक आहार घ्यावा. वजनावर नियंत्रण ठेवावे. नियमित स्वरुपात व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. किमान प्रतिदिन 30 मिनिटे, आठवड्याला 5 दिवस किंवा 150 मिनिटांचा व्यायाम आवश्यक ठरतो. वर्षातून एकदा हृद्याची तपासणी करावी. तुमच्या घरात यापूर्वीच कुणाला हृदयविकार असल्यास 5 वर्षातून एकदा सीटी कोरोनरी कॕल्शियम स्कोअरची तपासणी आवश्य करावी. धुम्रपान करणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. स्वतःला तणावमुक्त ठेवा. मनमोकळ आयुष्य जगा. विशेष म्हणजे पर्याप्त झोप घ्या. नियमित 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेतल्यास हृदयविकार टाळता येऊ शकतो.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.