AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत माझा माल, रेकीसाठी त्यांनीच…’, गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला

sanjay raut and gulabrao patil: संजय राऊत यांच्या घराची रेकी कोणी करणार? तो माझा माल आहे. रेकी करण्यासाठी संजय राऊत यांनीच माणसे पाठवली असतील, असा टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

'संजय राऊत माझा माल, रेकीसाठी त्यांनीच...', गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला
sanjay raut and gulabrao patil
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 20, 2024 | 7:23 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी झाल्याचा प्रकार समोर आला. त्यावर विरोधकांकडून रान उठवले जात आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षेची मागणी होत आहे. या विषयावर फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी संजय राऊत यांना आपला माल म्हटले आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या घराची रेकी कोणी करणार? तो माझा माल आहे. रेकी करण्यासाठी संजय राऊत यांनीच माणसे पाठवली असतील, असा टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला. शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, मंत्रिमंडळाचे खाते वाटप एक-दोन दिवसांत होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

राऊत यांची मोदी, शाह अन् फडणवीस यांच्यावर टीका

घराची रेकी झाल्यानंतर संजय राऊत भांडूपमध्ये आले. त्यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मोदी, शाह आणि फडणवीस यांना आपला आवाज बंद करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. माझा पोलिसांवर विश्वास आहे.मुंबई पोलीस या घटनेचा तपास करण्यास सक्षम आहे, असे राऊत यांनी सांगितले.

रेकी प्रकरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिसांशी बातचीत केली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मला मुंबई पोलीस विश्वास आहे. माझी सुरक्षा सामनाचा संपादक असल्यापासून होती.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझी सुरक्षा कायम होती. नवीन सरकार आले अडीच वर्षापूर्वी तेव्हा राजकीय विरोधकांची सुरक्षा काढून घेतली.परंतु मी महायुतीवर टीका करतो म्हणजे ते मला शत्रू समजतात. आम्ही राजकारणात टीका करतो तर तुम्ही आम्हाला शत्रू समजतात या पद्धतीचे राजकारण कधीच झाले नाही. माझ्या घरावर पाळत ठेवणे हे नवीन नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत