AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून विमा कंपनी विरोधात झाला गुन्हा दाखल; कोट्यवधींची झाली आहे फसवणूक

विमा कंपनी विरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे आता पुढील निर्णय काय होणार याकडे साऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

...म्हणून विमा कंपनी विरोधात झाला गुन्हा दाखल; कोट्यवधींची झाली आहे फसवणूक
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 22, 2023 | 12:10 AM
Share

अकोला: राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे कंबरडे मोडले असतानाचा विमा कंपन्यांकडून मात्र शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता विमा कंपन्याविरोधात शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अकोल्यात विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे आता अकोल्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या कंपनीविरोधात नेमका काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे

पीक नुकसानीच्या पंचनाम्यात खोडताड प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर लोंबार्ड या विमा कंपनीच्या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळीही जिल्ह्यात विविध ठिकाणी विमा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करुन विमा कंपन्यांना जाब विचारण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा या प्रकरणावरून विमा कंपन्याविरोधात आवाज उठवण्यात आला आहे.

तर जिल्हातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असतानासुद्धा सदर नुकसानीच्या पंचनाम्यात काही ठिकाणी खोडताड झाल्याची बाब निदर्शनास आणली होती तर, याप्रकरणी कृषी प्रशासनाने अकोला शहरातल्या खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तर शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाखांनी फसवणूक केल्याची माहितीही समोर आली आहे.

विमा कंपनी विरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे आता पुढील निर्णय काय होणार याकडे साऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

एकीकडे राज्यातील शेतकरी अवकाळी, गारपीट आणि बाजारभावामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी फक्त अश्वासानांची खैरात करत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडूनही जर शेतकऱ्यांना अशी वागणून मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Follow Us
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं