AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबाचा मोठा निर्णय! तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, नेमकं कारण काय?

Khavdya Dongar Case: तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र झाले नाहीत. पोस्टमार्टमनंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आले. मात्र नातेवाईकांनी मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला, तर संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह आईच्या गावी मुकुंदवाडी येथे नेऊन तिथे अंत्यसंस्कार केले.

Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबाचा मोठा निर्णय! तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, नेमकं कारण काय?
Khavdya DongerImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 9:43 AM
Share

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचा समावेश आहे. १८ वर्षीय कुणालच्या हट्टामुळे तिघांनाही जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या आई-वडिलांना रात्री अंत्यसंस्कार होईपर्यंत नातेवाईकांनी कळू दिली नव्हती. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे.  एकाच कुटुंबातील असूनही तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र केले गेले नाहीत.

शुक्रवारी रात्री धनगरपिंपळगाव परिसरातील शिवलाल वस्ती येथील शेतात बारा ते साडेबारा या वेळेत मुरलीधर यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र झाले नाहीत. पोस्टमार्टमनंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आले. मात्र नातेवाईकांनी मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला, तर संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह आईच्या गावी मुकुंदवाडी येथे नेऊन तिथे अंत्यसंस्कार केले. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र का केले गेले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

चांदगुडे कुटुंबातील वाद

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालच्या आजोळी सतत वाद सुरु होते. 20 वर्षांपूर्वी मूरलीधर यांनी स्वत:च्या मर्जीने लग्न केले आणि लग्न करताना आई-वडिलांना देखील सांगितले नव्हते. त्यामुळे चांदगुडे कुटुंबात वाद सुरु झाले होते. त्यानंतर मूरलीधर यांनी जमिनीच्या काही मोजकाच हिस्सा बहिणींना दिला होता. या सगळ्यामुळे कुणालदेखील नैराश्यामध्ये गेला होता.

मुरलीधर यांच्या ७५ वर्षीय वडिलांनी तीन एकर जमिनीव्यतिरिक्त काही जमीन कुणालच्या तीन आत्यांना दिली होती. या जमिनीच्या वाटपावरून कुणालच्या आई-वडिलांमध्ये सतत वाद होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळेच कुणाल आणि संगीता गावात फारसे दिसत नसत, असेही गावकऱ्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Follow Us
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक...
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक मुर्तीचा...
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...