AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती दिवस शिळ्या भाकरी खाणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर भाजप नेत्याचे विधान चर्चेत

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 ला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता असं विधान केले आहे. यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

किती दिवस शिळ्या भाकरी खाणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर भाजप नेत्याचे विधान चर्चेत
Bawankule on Prithviraj ChavhanImage Credit source: Google
| Updated on: Aug 21, 2026 | 3:28 PM
Share

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 ला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या या विधानावर राज्यातील अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर बोलताना मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

किती दिवस शिळ्या भाकरी खाणार?

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर प्रश्न विचारला होता. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘पृथ्वीराज चव्हाणांनी एक आत्मचरित्र लिहावे. किती दिवस शिळ्या भाकरी खाणार, त्यांनी वर्तमानावर बोलावं. माझी त्यांना विनंती आहे की भूतकाळात आता कुणी विश्वास ठेवत नाही. वर्तमान आणि भविष्य याबाबत चव्हाण यांनी काळजी घेतली पाहिजे.’

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की, ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापनेचा 2014 सालीच प्रस्ताव आलेला. पण मी तिथल्या तिथे तो प्रस्ताव रिजेक्ट केला. आमच्या पक्षाला शिवसेनेसोबत जाणं मान्य होणारच नव्हतं. पुढे 2019 साली मीच मविआचा प्रस्ताव पुढे केला होता असंही चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दावा फेटाळला

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही चव्हान यांच्या विधानावर भाष्य केले आहे. पटेल यांनी, असा कुठलाही प्रस्ताव आला नव्हता अशी प्रतिक्रिया दिली असून या विषयावर अधिक बोलणे टाळले आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही यावर भाष्य केले आहे. पाटील यांनी म्हटले की, ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्तावाबद्दल त्याच वेळी सांगायला हवं होते. आता त्या गोष्टींवर एवढे पाणी फिरले आहे. ते (शिवसेना आताचा ठाकरे गट) काँग्रेस सोबत गेल्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या मूळ विचारांसोबत बाहेर पडलो. त्यामुळे उठाव झाला.’

Follow Us
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...